शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

'आम्हाला गद्दार म्हणून नका, आम्ही शिवसेना...' शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 3:29 PM

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे नुकसान झाले.'

अहमदनगर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांवर ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जात आहे. बंडखोर आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. यावर शिवसेना नेते(शिंदे गट) आणि राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'हिंदूत्वापासून शिवसेना...'शंभूराज देसाई आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देसाई म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना गद्दार म्हटले जाते, पण आम्ही कोणीही शिवसेना (Shivsena) सोडलेली नाही. ज्वलंत हिंदूत्वाच्या विचारा पासून शिवसेना बाजूला जात आहे. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारपासून फारकत घेतली,' असं देसाई म्हणाले.

देसाई पुढे म्हणाले की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे नुकसान झाले. शिवसैनिकांचे नुकसान झाले, ते थांबण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी आम्ही ही भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणता येणार नाही,' असंही देसाई म्हणाले. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरही भाष्य केले. 'शिंदे गटाने घेतलेली भूमिका ही सर्व सामान्य जनतेने स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रातील जनता कोणा बरोबर आहे हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल,' असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर निशाणासत्ता स्थापनेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकवेळा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन विरोधक त्यांच्यावर टीका करत असतात. त्यावर बोलताना देसाई म्हणाले की, 'मुख्यमंत्री दिल्लीत जातात ते राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन जातात. मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीला गेले तेंव्हा राज्याच्या प्रलंबित निधीबाबत त्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली. तुम्ही जेंव्हा मुख्यमंत्री होतात, तेंव्हा मंत्रालयात येत नव्हता,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे