शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 15:16 IST

युवराजांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंना २ विधान परिषदेची आमदारकी द्यावी लागली अशी टीकाही मंत्री शंभुराज देसाई यांनी केली.

मुंबई - राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एका नाण्याच्या २ बाजू आहेत. आम्ही जो उठाव केला तो स्वाभिमानासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी केला. जे राऊत बोलतात, तेच उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे बोलतात. अजित पवारांचे प्रॅक्टिकल बोलणे असते. ज्याला जिकडे जायचे तिकडे जाऊद्या असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे आता ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी आहे अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, युवराजांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंना २ विधान परिषदेची आमदारकी द्यावी लागली. एक सचिन अहिर, दुसरी सुनील शिंदे यांना दिली. एका आमदाराला निवडून आणण्यासाठी २ आमदारकी द्यावी लागली ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. केवळ युवराजांच्या प्रेमापोटी आहे. त्यामुळे आता कोण मोठा हे त्यांच्यात लागले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेबाबत विधिमंडळ सचिवालय निर्णय घेईल. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माजी राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नाही. नवीन राज्यपाल राज्यात आलेत. त्यामुळे केवळ स्टंटबाजी करणे ही नेहमीची पद्धत आहे. नेत्यांपर्यंत आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याचा अंबादास दानवेंचा केविळवाणा प्रयत्न आहे असा टोला शंभुराज देसाई यांनी लगावला. 

दरम्यान, सर्व्हे वेगवेगळ्या संस्थांचे येतात. प्रत्येकाची पद्धत, कॅलक्युलेशन वेगळे असतात. मागच्या जाहिरातीच्या वादावर पडदा पडला आहे. शिवसेना-भाजपा निवडणुकीत २०० हून अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२४ चा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातला निर्णय एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस घेतील. त्यानंतर दिल्लीतील निर्णयानंतर पुढील गोष्टी होतील. परंतु २०२४ च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार-खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न आमचा आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारShambhuraj Desaiशंभूराज देसाई