शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप
2
Rohini Acharya : "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट
3
'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट
4
नितीश कुमार यांनी ज्येष्ठ नेत्याला दिला पक्षातून नारळ, जेडीयू म्हणाली, आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही
5
Travel : गोव्याचे 'हे' ५ नाईट मार्केट्स एकदातरी बघायलाच हवे! शॉपिंग प्रेमी अन् पर्यटकांसाठी जणू स्वर्गच
6
"३ वर्ष काम बंद, नवीन घराचा हफ्ता द्यायला पैसे नव्हते, त्यावेळी..."; अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा विलक्षण अनुभव
7
भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या
8
IND vs NZ ODI Record: किंग कोहलीकडे विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला मागे टाकत नवा इतिहास रचण्याची संधी
9
Reliance Jio IPO कधी खुला होणार, GMP ९३ रुपयांवर; काय आहे असेल प्राईज ब्रँड?
10
भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज
11
२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार
12
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
13
Numerology: ११ जानेवारीला उघडणार ब्रह्मांडाचे दार; एक तीव्र इच्छा दिवसभरात दोनदा व्यक्त करण्याची संधी!
14
संशयाने चार मुलांना केले अनाथ ! दगडावर ठेचून पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; ८० वर्षीय आजोबांवर आली जबाबदारी
15
WPL 2026 Double Header UP vs GG And MI vs DC Live Streaming : 'डबल हेडर'चा थरार! जेमिमासाठी MI विरुद्धची मॅच ठरेल खास; कारण...
16
२०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींना साडेसाती, ‘हे’ उपाय करा; शनि काही बिघडवणार नाही, उलट कृपाच करेल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांची नजर असलेल्या ग्रीनलँडमध्ये भारतीय रुपयाची ताकद किती? १००० रुपयांत तिथे काय मिळेल?
18
Healh Tips: जीम न लावता, डाएट न करता पोट कमी करायचंय? रोजच्या जेवणात करा 'हा' बदल 
19
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गांचा नवा प्लॅन तयार, कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:24 IST

कोल्हापूरकर हद्दवाढीला प्रतिसाद देतील

मुंबई-कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे. काही लोकांनी त्याला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून तो कमीत कमी बागायती शेतीमधून जाणारा असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमतच्या मुलाखतीत केला. महापालिका निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आम्ही आवाहन करणार असून कोल्हापूरकर त्याला प्रतिसाद देतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे हे मी सुरुवातीला समजावून सांगत होतो. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांना समजले होते ते आमच्यासोबत होते. आता सर्वांच्या ते लक्षात आले असून आम्ही त्याचा नवा मार्ग तयार केला आहे. नवीन मार्ग कुणी विरोध केला म्हणून तयार केलेला नाही. नवीन ग्रीनफील्ड महामार्ग तयार करताना नवीन एरिया ओपन व्हावेत हा उद्देश आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग व शक्तीपीठ हे दोन्ही मार्ग समांतर होत होते. त्याचा दोन्ही महामार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला असता. यामुळे नवीन परिसराचा यात समावेश होत नव्हता. म्हणून आम्ही नवीन परिसराचा समावेश असणारा मार्ग तयार केला. यात कमीत कमी बागायती शेती, कमीत कमी जंगल परिसर येईल. या प्लॅननुसार आम्ही शक्तीपीठ महामार्ग नेणार आहोत. यात जिल्हे तेच आहेत, कोणताही जिल्हा बदललेला नाही. काही तालुके व परिसर बदलला आहे. या नवीन प्लॅननुसारच शक्तीपीठ होणार असून यात कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.

बाहेरच्या परिसराचा चुकीच्या पद्धतीने विकासकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत कोल्हापूरकरांनी ठरवायचे आहे. मात्र, कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे, असे स्पष्ट मतही फडणवीस यांनी या मुलाखतीत व्यक्त केले. ते म्हणाले, आज कोल्हापूर शहराचा कोंडमारा झाला आहे. बाहेरचा जो भाग आहे तिथे महानगरपालिकेचा अंमल नसल्याने हा भाग चुकीच्या पद्धतीने विकसित होतोय. तेथील बांधकामे, रचना चुकीच्या पद्धतीने होत आहे. म्हणजे येथील परिस्थिती हातातून निघून जाईल. कोल्हापुरात सर्किट बेंच आल्यानंतर ते प्रमुख शहर झाले आहे. आधीही हे शहर प्रमुखच होते. पाच जिल्ह्यातील लोकं रोज तेथे येणार आहेत. त्यामुळे आता जर हद्दवाढ कोल्हापुरने केली नाही तर पुढच्या काळात कोल्हापूर शहराचे महत्त्व हळूहळू कमी होईल. त्यामुळे हद्दवाढ केली पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.कर कमी केल्याने विरोध होणार नाहीपूर्वी हद्दवाढ झाली की विकास होण्यासाठी पाच-सहा वर्षे लागत होती. महानगरपालिकेचे कर द्यावे लागत होते. त्यामुळे हद्दवाढीला विरोध होत होता. आता आम्ही ते बदलले असून कमी दराने कर लावतो. त्यामुळे ही समस्या आम्ही सोडवली आहे. निवडणुकीनंतर कोल्हापूरकरांना हद्दवाढ करण्यासाठी आवाहन करणार असून कोल्हापूरकर त्याला प्रतिसाद देतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipeeth Highway: New Plan Minimizes Impact on Farmland, Claims CM

Web Summary : Chief Minister Fadnavis announced a revised Shaktipeeth Highway plan minimizing farmland impact. He urged Kolhapur to expand city limits, preventing disorganized development and future decline. Reduced taxes aim to ease expansion concerns.