शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरण : तिन्ही गुन्हेगारांना फाशी नव्हे, जन्मठेप; उच्च न्यायालयाने केली शिक्षेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 06:58 IST

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे या अपिलावर सुनावणी सुरू होती.

मुंबई : मुंबईसह संपूर्ण देशाला हादवणाऱ्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींची उच्च न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा रद्द करत त्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर केले. त्यांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ‘मृत्यूमुळे पश्चात्तापाची संकल्पना संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप करण्यासाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी लागेल,’ असे म्हणत न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेत कपात करत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मात्र, जन्मठेप भोगत असताना त्यांची फर्लो किंवा पॅरोलवर सुटका केली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे या अपिलावर सुनावणी सुरू होती. गेल्या महिन्यात न्यायालयाने या अपिलावरील निर्णय राखून ठेवला होता. अखेरीस सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सात वर्षांनी गुरुवारी उच्च न्यायालयाने या अपिलावर निकाल देताना तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत तिचे जन्मठेपेत रुपांतर केले.

२०१३ मध्ये घटना घडली तेव्हा विजय जाधव १९, कासीम शेख २१ आणि अन्सारी २८ वर्षांचा होता. आरोपींनी दिलेली कबुली आणि तरुणी वासनेचा विषय होती, अशी आरोपींनी केलेली टिप्पणी यावरून आरोपींमध्ये सुधारणेला वाव नाही. आरोपींच्या कुटुंबीयांना त्यांच्या झोपडीतून हाकलण्यात आले असून त्यांना फूटपाथवर राहावे लागत आहे, हे विचारात घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.     

बलात्काराचा प्रत्येक गुन्हा हा घृणास्पद आहे. बलात्कार पीडितेच्या केवळ शारीरिक आरोग्यावर नाही तर तिच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. तिच्या आयुष्यातील स्थिरतेवरही परिणाम होतो. पण घटनेवर चालणारे न्यायालय जनमतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा आहे तर फाशीची शिक्षा ही अपवादात्मक आहे. - उच्च न्यायालय 

टॅग्स :MolestationविनयभंगHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयjailतुरुंग