शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांना धक्का; भाजपाच्या आमदार राम शिंदेंनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:36 IST

राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आता हळूहळू समोर येत आहे. त्यात काही ठिकाणी शिंदे गटाला विजय मिळत असल्याचं दिसून आले आहे.

कर्जत - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यात रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. 

अलीकडेच राम शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत राम शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्याकडे आल्या आहेत. कोरेगाव येथे १३ पैकी ७, बजरंगवाडी येथे ७ पैकी ५, कुळधरण येथे १३ पैकी ७ जागांवर राम शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निकालाने स्थानिक आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. 

राज्यात एकनाथ शिंदे गटाची विजयी वाटचालऔरंगाबाद येथील अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात असलेल्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. याठिकाणी ३ पैकी २ ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सत्ता आली आहे. नानेगाव आणि जंजाळ ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे सातारा येथे शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत जिंकली आहे. शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात उत्तर तांबवे येथे देसाई पॅनेल विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीत २२ वर्षानंतर सत्तांतर घडलं आहे. पैठण तालुक्यात ७ पैकी ६ ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झाल्याचं दिसून येत आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाला मिळालं यशशिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRam Shindeराम शिंदेShiv Senaशिवसेना