शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

१५ सप्टेंबरला १ लाख बँक कर्मचारी संसदेवर धडकणार, बँक विलीनीकरणाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:16 IST

सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने १५ सप्टेंबरला संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. रामलीला मैदान ते संसद भवन असा सुमारे एक लाख बँक कर्मचारी व अधिका-यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा दावाही फोरमने केला आहे.

मुंबई, दि. 8 - सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने १५ सप्टेंबरला संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. रामलीला मैदान ते संसद भवन असा सुमारे एक लाख बँक कर्मचारी व अधिका-यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा दावाही फोरमने केला आहे.रामलीला मैदानावरून सकाळी १० वाजता सुरू होणा-या मोर्चाचे संसद भवन मार्गावर आल्यावर भव्य सभेत रूपांतर होईल. शासनाने प्रस्तावित केलेल्याखासगीकरण व बँकांच्या विलीनीकरणाच्या धोरणाच्या विरोधात हा मोर्चा काढणार असल्याचे फोरमने सांगितले. जगभरात बँक खासगीकरणाचा प्रयत्न अपयशी ठरलेला असून बँकांची विलीनीकरण रद्द केली जात आहेत. देशात मात्र याउलट परिस्थिती दिसत आहे. सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाची बचत केलेले १०० लाख कोटी रुपये आज सर्व सरकारी बँकांत सुरक्षित आहेत. मात्र बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्व बचतीची सूत्रे आजवर ७ लाख कोटी रुपयांची कर्जे थकवून त्या बचतीचा अपहार केलेल्या भांडवलदारांच्या हाती जाण्याची भीती फोरमने व्यक्त केली आहे.फोरमने केलेल्या दाव्यानुसार, सरकारकडे केलेल्या मागण्यांपैकी एकही मागणी कर्मचारी आर्थिक लाभ विषयक किंवा वेतन सुधारणाबाबत नाही. तरीही २२ आॅगस्टला पुकारलेल्या संपात कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. सर्व सामान्य नागरिकांच्या हितरक्षणाच्या लढाईत उतरलेला बँककर्मचारी अधिकारी वर्ग देशभक्तीच्या भावनेने प्रेरित झालेला आहे..............................बँक कर्मचा-यांच्या मागण्या काय?थकीत कर्ज बुडव्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी.सरकारने कर्ज बुडव्यांची यादी जाहीर करावी.भारतीय दंड संहितेत बदल करून कर्ज बुडवणे हा गुन्हा ठरवावा.निवडणूक कायद्यात योग्य बदल करून कर्ज बुडव्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे.कर्ज बुडव्या कंपन्यांचे उत्तरदायित्व निश्चित करणारी नियमावली करावी...........................................आॅक्टोबर अखेरीस दोन दिवसांचा संपबचत ठेवींवरील व्याजदरात केलेल्या  कपातीचा व वाढवलेल्या सेवाशुल्काच्या दराचा फोरममधील सर्व संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. कंपन्यांच्या कर्ज बुडवेगिरीमुळे झालेले नुकसान सर्व सामान्य जनतेच्या पैशातून वसूल करण्याचा शासनाचा प्रयत्न चुकीचा आहे. तरी सर्व संघटना आपल्या मागण्यांचापाठपुरावा करण्यासाठी आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवसांचा संप करण्याचे देखील ठरवीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.