शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:26 IST

Ashish Shelar : तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मच्छीमारांना भेटण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी दोन दिवस किनारपट्टीचा दौरा करीत आहेत.

ठळक मुद्देआज त्यांनी डहाणू येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. सरावली येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक यावेळी घेतली. 

डहाणू/पालघर :  तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. डहाणूतील चिकू, आंबा, केळी, मिरची आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. घरांची पडझड झाली आहे, या सर्व बाबींचे पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी, अशा सूचना भाजपाआमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी डहाणू दौऱ्यात केल्या.

तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मच्छीमारांना भेटण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी दोन दिवस किनारपट्टीचा दौरा करीत आहेत. आज त्यांनी डहाणू येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. सरावली येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक यावेळी घेतली. 

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की,  चिकूचे फळ तयार होण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. या वादळाने आता चिकूचे फळ तयार होत असताना हाताशी आलेले फळ तर वाया गेलेच शिवाय नवीन आलेला फुलोरा ही वाया गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या किसान ट्रेनमुळे चिकू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. नुकतेच 6 बोगी दिल्लीच्या मार्केटमधे गेल्या. त्यानंतर हंगाम सुरु होत असतानाच वादळाने बाग पुर्णपणे उद्धवस्त झाल्या. त्यासोबत याच पट्ट्यात केळी, आंबा, भात, मिरची सह कोळंबी उत्पादक शेतकऱ्याला ही मोठा फटका बसला आहे. याचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. 

ज्या ज्या वेळी अशा नैसर्गिक आपत्ती मध्ये शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांना कधीच मदत मिळत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात चिकू उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीचा पिक विमा उतरवला जात होता. मात्र आघाडी सरकारने या नियमात बदल केल्याने केवळ 4 एकरचा विमा उतरवला जातो. त्यातही 50 टक्केच रक्कम मिळते. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला शासनाने तातडीने मदत करावी, तसेच पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशा मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

दरम्यान,  आमदार मनिषा चौधरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व बाबींचे तातडीने पंचनामे करा. अशा संकटकाळी योग्य मागणी आणि वस्तुस्थिती सांगणारे पंचनामे होणे आवश्यक असतात. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, अधिकारी पंचनामे नीट करीत नाहीत आणि योग्य मागणीच होत नाही. त्यामुळे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना त्यांनी केल्या. 

आमदार आशिष शेलार यांनी म्हणाले की, शेतकऱ्यांवरील संकट मोठे आहे. तसेच नुकसान भरपाई देणारा जीआर तोकडा आहे. त्यामुळे शासनाने अधिकचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी नुकसानीच्या दाहकतेचे वास्तव चित्र कागदोपत्री दिसेल, अशा पद्धतीने पंचनामे करावे. आम्ही विधानसभेत, प्रसंगी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांचे म्हणणे, व्यथा, मागण्या आक्रमकपणे मांडू, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पक्ष म्हणून सुद्धा भाजपा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वस्त केले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारManisha Chaudharyमनीषा चौधरीBJPभाजपाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ