शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

काँग्रेसचा खळबळजनक अंतर्गत सर्व्हे; इच्छुकांची संख्या तिपटीने वाढली, भाजपच्या मोहिमेला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:26 IST

२०१४ पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेस दुबळी पडत चालली होती, त्यातच २०१९ मध्ये भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. यामुळे काँग्रेस संपली असे बोलले जात होते.

गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा काँग्रेसकडे उच्छुकांची संख्या कमालीची वाढली आहे. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारतला यामुळे धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी तब्बल १४०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज काँग्रेसकडे आले आहेत. २०१९ मध्ये हीच संख्या 476 एवढी होती. 

काँग्रेस मविआमध्ये असल्याने २८८ पैकी ९०-१०० जागाच लढवणार आहे. तरी देखील काँग्रेसकडे सर्व मतदारसंघातून लढण्यासाठी अर्ज आले आहेत. यात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक अर्ज आले आहेत. 

२०१४ पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेस दुबळी पडत चालली होती, त्यातच २०१९ मध्ये भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. यामुळे काँग्रेस संपली असे बोलले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसाच प्रचारही करत होते. परंतू, यंदाच्या लोकसभेला काँग्रेसने १०० चा आकडा गाठला आणि नाऊमेद झालेल्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. 

महाराष्ट्रात काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत ८० ते ९० जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तसेच हा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असेही सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागितले होते. या अर्जांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. 

२०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभेला काँग्रेसने ४२ आणि ४४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ ला शरद पवारांमुळे काँग्रेसला या जागा टिकविता आल्या होत्या असेही सांगितले गेले होते. आता पाच वर्षांत ही परिस्थिती बदलली असून काँग्रेसच्या ९० जागा येतील असा अंदाज आहे. यामुळे मविआच्या बैठकीत काँग्रेसने 135 जागा लढविण्याचा प्रस्ताव ठेवल्याचेही सांगितले जात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४