शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

काँग्रेसचा खळबळजनक अंतर्गत सर्व्हे; इच्छुकांची संख्या तिपटीने वाढली, भाजपच्या मोहिमेला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:26 IST

२०१४ पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेस दुबळी पडत चालली होती, त्यातच २०१९ मध्ये भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. यामुळे काँग्रेस संपली असे बोलले जात होते.

गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा काँग्रेसकडे उच्छुकांची संख्या कमालीची वाढली आहे. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारतला यामुळे धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी तब्बल १४०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज काँग्रेसकडे आले आहेत. २०१९ मध्ये हीच संख्या 476 एवढी होती. 

काँग्रेस मविआमध्ये असल्याने २८८ पैकी ९०-१०० जागाच लढवणार आहे. तरी देखील काँग्रेसकडे सर्व मतदारसंघातून लढण्यासाठी अर्ज आले आहेत. यात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक अर्ज आले आहेत. 

२०१४ पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेस दुबळी पडत चालली होती, त्यातच २०१९ मध्ये भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. यामुळे काँग्रेस संपली असे बोलले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसाच प्रचारही करत होते. परंतू, यंदाच्या लोकसभेला काँग्रेसने १०० चा आकडा गाठला आणि नाऊमेद झालेल्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. 

महाराष्ट्रात काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत ८० ते ९० जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तसेच हा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असेही सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागितले होते. या अर्जांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. 

२०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभेला काँग्रेसने ४२ आणि ४४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ ला शरद पवारांमुळे काँग्रेसला या जागा टिकविता आल्या होत्या असेही सांगितले गेले होते. आता पाच वर्षांत ही परिस्थिती बदलली असून काँग्रेसच्या ९० जागा येतील असा अंदाज आहे. यामुळे मविआच्या बैठकीत काँग्रेसने 135 जागा लढविण्याचा प्रस्ताव ठेवल्याचेही सांगितले जात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४