शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

निवड विधिमंडळासाठी, सेवा महसूलमंत्र्याची!  विशेष कार्य अधिकारी पद वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 6:10 AM

विधिमंडळ सचिवालयात मोठ्या प्रमाणावर अधिकाºयांची कमतरता असल्याचे भासवत विशेष कार्य अधिकारी हे पद भरण्याचा प्रस्ताव तयार करून त्या जागेवर श्रीनिवास जाधव यांची ‘कायमस्वरूपी बदलीने नियुक्ती’ केली गेली.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधिमंडळ सचिवालयात मोठ्या प्रमाणावर अधिकाºयांची कमतरता असल्याचे भासवत विशेष कार्य अधिकारी हे पद भरण्याचा प्रस्ताव तयार करून त्या जागेवर श्रीनिवास जाधव यांची ‘कायमस्वरूपी बदलीने नियुक्ती’केली गेली. मात्र, बदली कायमस्वरूपी नसते आणि कायमस्वरूपी नियुक्ती ही बदली नसताना जाधव यांची बदली झाली की कायमची नियुक्ती, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. २०१४ मध्ये भाजपाचे सरकार येताच जाधव यांची नियुक्ती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात केली गेली.जाधव यांच्या सगळ्या नेमणुकांमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यातीलठळक गोष्टी अशा - विशेष कार्य अधिकारी हे पद निर्माण करताना जी भूमिका विधानमंडळ सचिवालयाने मांडली होती, त्यालाच छेद देत तीन वर्षे विधिमंडळातील विशेष कार्य अधिकारी हे पद रिक्त ठेवून जाधव यांची महसूलमंत्र्यांकडे नेमणूक केली गेली. त्या कालावधीत विधिमंडळ सचिवालयाने जाधव यांच्या मंत्री आस्थापनेवर जाण्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोणाचीही नेमणूक केली नाही. तीन वर्षे हे पद रिक्त राहिल्यामुळे ते आपोआप व्यपगत होते. जाधव यांच्या निवृत्तीनंतर पुन्हा त्यांना मंत्री आस्थापनेवर एक वर्ष मुदतवाढ दिली गेली. याचा अर्थ जाधव यांची विधिमंडळ सचिवालयाला गरज होती की मंत्री आस्थापनेला हे एक गौडबंगाल असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.जाधव यांनी मंत्री आस्थापनेवर जाताना जो अर्ज केला होता त्यात ‘आपण विधानसभा अध्यक्ष यांच्या आस्थापनेवर सचिव या पदवार काम करत आहे व माझ्या प्रशासकीय कामाचा अनुभव व शैक्षणिक अर्हता लक्षात घ्यावी’ असे म्हटले होते. पण अध्यक्ष किंवा मंत्री आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने जरी काम केलेलेअसले तरी ते काम खासगी आस्थापनेवरील असल्यामुळे तो अनुभव गृहीत धरला जात नाही तरीही त्यांनी तसे भासवून ती मागणी केली होती.एसटी महामंडळातून विधिमंडळात जाधव यांची नेमणूक करायची होती. त्यासाठीच्या मुख्यमंत्री, अध्यक्ष, सभापती यांच्या बैठकीत स्वत: जाधवही उपस्थित होते. त्या बैठकीत त्यांच्यासाठीच पद निर्माण करायचे असताना ते स्वत:च तेथे हजर राहिल्याच्या नोंदी आहेत.बुलेट ट्रेनच्या वेगाने कामजाधव यांची एसटी महामंडळातून विधिमंडळात नियुक्ती करताना अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री, प्रधान सचिव (वित्त), सचिव (व्यय), उपसचिव, अव्वर सचिव, याशिवाय विधिमंडळाचे प्रधान सचिव, अव्वर सचिव, कक्ष अधिकारी अशा अनेक अधिकाºयांच्या सह्या आणि तत्कालीन सभापती बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेले नेमणूकपत्र या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी म्हणजे ३१ आॅगस्ट २००९ रोजीच्या आहेत. एकाच दिवशी एवढे सगळे अधिकारी, नेते एकत्र आले आणि त्या फाइलवर सह्या करून मोकळे झाले. एवढ्या वेगाने तर मागच्या आणि आताच्या सरकारने एकही कल्याणकारी निर्णय घेतलेला नसेल. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार