क्षमता, ज्ञान, योग्यतेवर क्षेत्र निवडा

By Admin | Updated: July 1, 2014 00:59 IST2014-07-01T00:59:22+5:302014-07-01T00:59:22+5:30

दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते.

Select an area of ​​competence, knowledge and merit | क्षमता, ज्ञान, योग्यतेवर क्षेत्र निवडा

क्षमता, ज्ञान, योग्यतेवर क्षेत्र निवडा

‘दहावीनंतर पुढे काय ?’मध्ये वक्त्यांचा सूर : विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते. विशेष म्हणजे, कोणतेही क्षेत्र निवडल्यानंतर त्यातील ज्ञान अपडेट ठेवणे आवश्यक असते, असा सूर वक्त्यांचा होता.
‘लोकमत युवा नेक्स्ट’च्यावतीने ‘दहावी नंतर पुढे काय ?’ या शिर्षकांतर्गत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आज रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, जे.डी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे उपप्राचार्य श्रीकांत विजयराव सोनेकर, फ्युचर व्हिस्टाचे संचालक नितीन आचार्य, प्रेमलता डागा आणि निधी नशिने आदी उपस्थित होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात आयोजित या कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर ‘स्कोप’
इंजिनिअरिंग अभ्यासक्र मांच्या प्रवेश प्रक्रि येत नेमक्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, आरक्षणाचे नियम , जागांचं वाटप कसं असतं, आॅप्शन फॉर्म भरताना घ्यायची काळजी अशा अनेक बाबींविषयी असलेल्या शंकांचं निरसन श्रीकांत सोनेकर यांनी केले. ते म्हणाले, इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर स्कोप आहे. साधारण २०-२५ व्या वर्षी अर्निंग सोर्स सुरू करता येतो. इंजिनिअरिंगनंतर रिसर्च फिल्ड, फार्मा, बायोमेडिकल, इन्श्युरन्स या शिवाय गव्हर्नमेंट सेक्टर मध्येही जाता येऊ शकते. कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात साधारण ६-७ वर्षे जातात परंतु इंजिनिअरिंगमध्ये चारच वर्षे लागतात. यात शेवटच्या वर्षाला जॉब मिळविता येतो. एका निरीक्षणात असे आढळून आले आहे, २०१६ मध्ये भारतात ३ मिलेनियम इंजिनिअरिंगच्या पोस्ट निर्माण होणार आहेत.
लक्ष्य निश्चित करा
आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, हा कानमंत्र नितीन आचार्य यांनी दिला. ते म्हणाले, इंजिनिअरिंगच्या फक्त १० हजार जागा आहेत. यामुळे जेईईई मेन्स आणि बारावी बोर्डवर आपले लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर आयआयटीची तयारी करावी. यावेळी आचार्य यांनी फ्युचर व्हिस्टातील कोचिंग क्लासेसचीही माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Select an area of ​​competence, knowledge and merit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.