महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

By Admin | Updated: July 1, 2016 02:59 IST2016-07-01T02:59:32+5:302016-07-01T02:59:32+5:30

शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे

Seeding of the highway | महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण


अलिबाग : शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे. याच दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने अत्यंत आगळ््यावेगळ््या ‘गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा बीजारोपण मोहिमेचे’ आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आयोजित या मोहिमेत पाली येथील पालीवाला कॉलेजचे विद्यार्थी उपप्राचार्य प्रा.सुधीर पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली १००० बियांचे रोपण करणार आहेत, तर पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे विद्यार्थी पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावर बीजारोपण करण्याकरिता बिया वाटप करणार असल्याची माहिती शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांनी दिली आहे.
विसावा (महाड) येथे १० हजार बियांची उपलब्धता सफर केंद्र व सावली गोशाळेचे संचालक गणराज जैन व अ‍ॅड.अर्चना जैन यांनी केली आहे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांनी तितक्याच बियांची उपलब्धता ठेवली आहे.
बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी आठ वाजता विसावा (महाड) येथे महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले व शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पळस्पे (पनवेल) येथे माजी आमदार विवेक पाटील व व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन,खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी होणार आहे.
विसावा (महाड) येथील उपक्रमाकरिता सफर केंद्र आणि सावली गोशाला, आसनपोई-महाड आणि शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड या दोन संस्थांचे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबाग व भारत पेट्रोलियम वैभव आॅटोमोबाईल्स, पळस्पे-पनवेल या दोन संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
>बियांची नैसर्गिक रुजवात ८० टक्के
बीजारोपण ही वृक्ष आणि वन संवर्धनाकरीता अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रभावी प्रक्रीया आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून ही गोवा राष्ट्रीय माहामार्गाच्या दूतर्फा आगळी मोहीम हाती घेण्यात आल्याचे कळल्यावर खरच आनंद वाटला. हि मोहीम वैशिष्ठ्यपूर्ण आहे. बीया एके ठिकाणी रुजवून त्याची लागवड अन्यत्र करणे या प्रक्रीयेमध्ये रोपांची मर्तूक मोठ्या प्रमाणात होते असा आजवरचा अनूभव आहे. परंतू फणस, करंज, जांभूळ, आबा यांच्या बीयाच थेट लावल्या तर त्यांची रुजवात पावसाळ््यात ८० टक्के होते, हे निष्कर्श देखील आहेत.

Web Title: Seeding of the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.