शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य: राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 20:36 IST

देशाच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल

ठळक मुद्दे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा

पुणे :  भारताचे सर्व राष्ट्रांबरोबर संबंध नेहमी सौहार्दपूर्ण राहिले आहेत. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसाठी, सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पारंपरिक युद्धात पाकिस्तानचा भारतापुढे टिकाव लागत नाही, त्यामुळे आता पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग पत्करून भारताविरोधात छुपे युद्ध सुरू केले आहे. मात्र, या युद्धातही भारत त्यांना कधीच जिंकू देणार नाही. आजपर्यंत भारताने कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही, जर भारतावर आक्रमण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा सज्जड दम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी खेत्रपाल परेड मैदानावर पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, प्रबोधिनीचे प्रमुख एअरमार्शल आय. पी. विपीन, उप-प्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल उपस्थित होते.राजनाथ सिंह म्हणाले, भारताने दहशतवादाबरोबर प्रदीर्घ लढा दिला आहे. आंतराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने दहशतवादाचा नेहमीच विरोध केला आहे. जगाने ९/११ आणि २६/११ सारखे दहशतवादी हल्ले पाहिले आहेत. यामुळे आम्ही दहशतवाद्यांविरोधात लढण्यास सज्ज आहोत. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या  साडेपाच वर्षांत पाकव्याप्त काश्मिरात घुसून केलेली कारवाई आणि बालाकोट येथील हवाई हल्ल्याने दहशतवादाचा बिमोड आम्ही केला. जेव्हा एखादा देश त्याच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देत असेल आणि त्यांचा वापर भारतविरोधी करत असेल तर त्यांना आम्ही चोख उत्तर देऊ. पाकिस्तानने १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये थेट युद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. पारंपरिक आणि मर्यादित युद्धात भारताला हरवणे शक्य नसल्याने त्यांनी दहशतवाद या छुप्या युद्धाचा भारातविरोधात वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना या युद्धातही अपयश येत आहे. लष्कराला बळकटी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त विकास आणि कूटनीतीच्या माध्यमातूनदेखील लष्कराला बळकटी देण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानची दहशवादी कारवाईमधील भूमिका उघड केल्याने पाकिस्तान एकाकी पडला आहे. दहशतवादाविरोधात लष्कर कायम लढत आले आहे. याचबरोबर अर्धसैनिक बल तसेच पोलीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक दहशतवादी हल्ले निकामी करण्यात आले आहे. युद्ध लढण्यासोबतच सैन्याला सेवा आणि शांततेचा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे. भारतीय संविधानाची सुरक्षा आणि सन्मान राखण्यासाठी सैन्यदल आणि राजकीय शक्ती एकत्रित कार्यरत आहे. केवळ सैनिकांवर सुरक्षेची जबाबदारी नसून राजकीय व्यक्तींवर देखील त्याची बरोबरीने जबाबदारी आहे. त्यासाठी सैन्याला बळकटी देण्यासोबत देशाचा विकास आणि परराष्ट्र व्यवहार यावर ही भर दिला जात आहे.  ...........सैनिकांच्या कुटुंबियांच्या संरक्षण मंत्रालय नेहमी पाठिशीदहशतावादासोबतच सायबर गुन्हेगारी आणि तिरस्करी विचारधारा यांचेदेखील आव्हान सैन्यदलापुढे वाढत आहे. देशाच्या संविधानाची सुरक्षा आणि सन्मान राखणे हे सैन्यदल आणि राजकीय शक्ती यांचे एकत्रित कर्तव्य आहे. हे युद्ध लढताना, संरक्षण मंत्रालय नेहमीच आपल्या सैन्याशी पाठिशी आहे. तसेच युद्धभूमीवर लढणाºया सैन्यदलाच्या कुटुंबियांची जबाबदारी पार पाडण्यासाठी संरक्षण विभाग नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाहीदेखील सिंह यांनी दिली.  

..................एनडीएतील विद्यार्थी फौलादराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत येणारा कॅडेट हा सुरुवातीला सामान्य असतो. पालकांच्या प्रयत्नांमुळे या विद्यार्थ्यांना प्रबोधिनीत येण्याची प्रेरणा मिळते. येथे आल्यावर त्यांचा सुरुवातीचा काळ थोडा कठीण जातो. मात्र, येथील शिस्त, प्रशिक्षण आणि कठोर मेहनतीमुळे तुमची मुले ‘फौलाद’ होतात असे पालकांना उद्देशून राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेRajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान