शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंद, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षकांची जबाबदारी वाढली

By अतुल कुलकर्णी | Updated: September 19, 2020 06:27 IST

शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली.

- अतुल कुलकर्णीमुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ज्या जिल्ह्यात दोन आकडी रुग्ण संख्या होती तेथे आता रुग्णांची संख्या चार आकड्यांवर गेलेली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तर मुलांना याची लागण होईल. मुलांच्या माध्यमातून ही साथ त्यांच्या घरापर्यंत जाईल. हे होऊ द्यायचे नसेल तर शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवणे योग्य राहील, असे यावेळी सांगण्यात आले. राज्यातली एकही शाळा क्वारंनटाईनसाठी वापरली जात नाही, तसेच शिक्षकांच्या सेवा देखील मोठ्या प्रमाणावर आता कोरोनासाठी घेणे कमी झाले आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.आॅनलाइन शिक्षण घेण्यावरून यावेळी चर्चा झाली. अनेक भागात नेटवर्कचा प्रश्न आहे. त्यामुळे या शिक्षणाचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही, यावर जवळपास सर्व मंत्र्यांचे एकमत झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. मात्र दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांना रिकामे बसू न देता त्यांच्याकडून, त्यांच्या वयोगटानुसार, वेगवेगळ्या उपक्रम राबवून घेणे, अभ्यासक्रमांची ओळख कायम ठेवणे, या गोष्टी जाणीवपूर्वक शिक्षकांनी केल्या पाहिजेत.पालकांनी देखील यात हातभार लावला पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय तुटणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच होईल.कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्याचे आव्हानपहिली ते चौथी चेएकूण विद्यार्थी : ७९,३८,५९१पाचवी ते सातवीचेएकूण विद्यार्थी : ५८,८३,५२५आठवी ते दहावीचेएकूण विद्यार्थी : ५६,४९,१४९अकरावी-बारावीचेएक विद्यार्थी : २८,८४,७६८

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण