शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:32 IST

एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रि‍पदावर ठेवण्याची खरेच गरज आहे का..? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांनी याचा गंभीर विचार करायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

मुंबई - धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या पैशाची लूट केली असून कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण न करता कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया म्हणाल्या की, नॅनो युरीओ, नॅनो डिएपी, बॅटरी स्पेअर, कापूस गोळा करण्याच्या बॅगा यासारख्या ५ गोष्टींचे दर वाढवून त्या गोष्टी शासनाने खरेदी केल्या. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले त्यात नॅनो युरिया ९२ रुपयांना मिळणारी बॉटेल २२० रुपयांना खरेदी केली गेली. १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटेल दुपटीपेक्षा अधिक दराने खरेदी केल्या. नॅनो डिएपीच्या १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटेल ५९० रुपयांना खरेदी केली. ज्याची बाजारभाव किंमत २७९ रुपये होती. या दोन गोष्टी मिळूनच ८८ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. बॅटरी स्प्रेअर एमएआयडिसीच्या वेबसाईटवर २४५० रुपयांना मिळतो, तो आजच्या घडीला २९६० रुपयांना विक्री केला जातो. मात्र ही गोष्ट टेंडरमधून ३४२६ रुपयांना विकत घेतली जात होती. ५ लाखाहून अधिक त्याचे लाभार्थी होते. बजेट फिक्स होते, त्यामुळे लाभार्थी कमी करून २ लाख ३६ हजार ४३७ बॅटरी स्प्रेअर खरेदी केले.  ८१७ रुपयांना मिळणारं SNAILKILL हे १ किलो औषधं ८१७ रुपयांना मिळते ते १२७५ रुपयांना धनंजय मुंडे यांच्या काळात विकत घेतले गेले. १ लाख ९६ हजार ४४१ किलो खरेदी केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच डीबीटी योजना सरकारने थेट लाभार्थ्यांसाठी काढली होती. योजनेत जे सरकार पैसे देते ते लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाहीत म्हणून २०१६ साली सरकारने आदेश पारित केले. त्यावर महाराष्ट्र शासनाने १९ एप्रिल २०१७ साली जीआर काढला. लाभार्थ्यांना देण्यात येणारे पैसे डीबीटीतूनच द्यावेत असं सरकारने सांगितले. मात्र महाबीज, एमएआयडीसी यांना डीबीटी लागू नव्हते. १२ एप्रिल २०१८ रोजी काढलेल्या जीआरमध्ये डीबीटीच्या यादीत अधिक वाढ करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्‍यांना दिला होता. या यादीतून वगळण्याचा अधिकार समितीला देण्यात आला होता. डीबीटीतून एखादी गोष्ट वगळायची असेल तर समितीच्या परवानगीशिवाय ते करता येत नाही.  कॉटन स्टोरेज बॅग या जवळपास ६ लाख १८ हजार विकत घेतल्या. काही दिवसांपूर्वी सरकारी संस्थेने अशा २० बॅग विकत घेतल्यात. ती एक बॅग ५७७ रुपये प्रमाणे त्या खरेदी केल्या. मात्र धनंजय मुंडे यांच्या काळात १२५० रुपयांना विकत घेतल्या गेल्या. इतके महान कृषीमंत्री जुलै २३ ते नोव्हेंबर २४ या काळात पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रि‍पदावर ठेवण्याची खरच गरज आहे का..? जवळपास २७५ कोटींचा घोटाळा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांनी याचा गंभीर विचार करायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

दरम्यान, निविदा प्रक्रियेला आधी प्रशासकीय मान्यता मिळते, त्यानंतर जाहिरात निघते. मग निविदा प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर L1 टेंडरला काम दिले जाते मग त्याची वर्क ऑर्डर काढली जाते. धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आधी पूर्ण पैसे दिले गेलेत. कच्चा माल विकत घेण्यासाठी हे पैसे दिलेत. आधी पैसे द्यायचे आणि मग निविदा काढायची हे महाराष्ट्रात आतापर्यंत कुणी ऐकलेच नाही. १६ मार्चला पैसे देण्याची इतकी घाई का केली? नॅनो युरिआ, नॅनो डिएपीसाठी १६ मार्चला पैसे दिले, ३० मार्चला निविदा काढली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री अजित पवार यांचीही सही करून विशेष बाब म्हणून टेंडर काढले आणि घाईघाईत पैसे दिले. ही सरळ सरळ शेतकऱ्यांची लूट आहे. १ हजार कोटी शेतकऱ्यांसाठी दिले होते, धनंजय मुंडे यांच्यासाठी नव्हते. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारी २०२४ ला वित्त विभागाने जीआर काढत १५ फेब्रुवारीनंतर कुणीही कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये असं सांगितले होते. तरी १२ मार्चला नवीन जीआर निघतो, १६ मार्चला पैसे दिले जातात. घाईघाईत हे सर्व केले जाते हे सगळे गौडबंगाल आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेanjali damaniaअंजली दमानियाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे