शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रेल्वेने केली १४ कोटी लिटर पाण्याची बचत

By appasaheb.patil | Updated: June 7, 2019 12:42 IST

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचा उपक्रम; दुष्काळात रेल्वेला दिलासा, पुर्नप्रक्रिया करून पुन्हा वापरले पाणी

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने मागील वर्षात दूषित पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून तब्बल १४ कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे. एवढेच नव्हे तर ७५ हजार झाडे लावून वृक्षसंवर्धनाला गती देण्याचे कामही रेल्वे विभागाने सुरू केल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के. नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

भारतीय रेल हा भारत सरकारचा महत्त्वपूर्ण विभाग आहे़ या विभागातील सोलापूर विभागाने सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात ५ लाख लिटर, दौंड रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर व वाडी रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर क्षमतेचा पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट उभा केला आहे़ या प्रोजेक्टच्या माध्यमातून रेल्वेतील वापरण्यात आलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात आणण्याचे काम सोलापूर विभागाने मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे आतापर्यंत १४ कोटी लिटर पाण्याची बचत या माध्यमातून झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

सौरऊर्जेद्वारे १६ हजार युनिट विजेची निर्मिती- आजच्या जीवनामध्ये ऊर्जेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. ऊर्जेच्या पारंपरिक आणि अपारंपरिक साधनांचा काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या ऊर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. हाच धागा पकडून सोलापूर रेल्वे विभागाने सोलापूर विभागात ४ हजार ४०० एलईडी बल्ब लावले आहेत़ ज्यातून वर्षाला १३ लाख ८ हजार ७८० युनिटची बचत रेल्वेची होत आहे़ शिवाय भैय्या चौकात असलेल्या रेल्वे हॉस्पिटलवर १० किलो मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे वर्षाकाठी १६ हजार युनिटचे उत्पादन होत आहे़ ज्यामुळे १ लाख ४४ हजार रुपयांची बचत होत असल्याचेही व्ही. के. नागर यांनी सांगितले.

वृक्षसंवर्धनाला प्राधान्य- आपण निसर्गाचे काहीतरी देणं लागतो, या बांधिलकीतून सोलापूर रेल्वे विभागाने विभागांतर्गत येणाºया विविध रेल्वे स्टेशनवर वर्षभरात ७५ हजार झाडे लावली आहेत़ या झाडांचे संगोपन व निगा राखण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाºयांनी घेतल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के़ नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रेल्वे विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत़ भविष्यात १० रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प व ६ नवे पाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभाकरण्याचा मानस आहे़ लवकरच या कामांना सुरुवात होईल- व्ही़. के़ नागर, अपर रेल्वे मंडल प्रबंधक, सोलापूर विभाग

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ