शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

रेल्वेने केली १४ कोटी लिटर पाण्याची बचत

By appasaheb.patil | Updated: June 7, 2019 12:42 IST

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचा उपक्रम; दुष्काळात रेल्वेला दिलासा, पुर्नप्रक्रिया करून पुन्हा वापरले पाणी

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने मागील वर्षात दूषित पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून तब्बल १४ कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे. एवढेच नव्हे तर ७५ हजार झाडे लावून वृक्षसंवर्धनाला गती देण्याचे कामही रेल्वे विभागाने सुरू केल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के. नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

भारतीय रेल हा भारत सरकारचा महत्त्वपूर्ण विभाग आहे़ या विभागातील सोलापूर विभागाने सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात ५ लाख लिटर, दौंड रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर व वाडी रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर क्षमतेचा पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट उभा केला आहे़ या प्रोजेक्टच्या माध्यमातून रेल्वेतील वापरण्यात आलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात आणण्याचे काम सोलापूर विभागाने मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे आतापर्यंत १४ कोटी लिटर पाण्याची बचत या माध्यमातून झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

सौरऊर्जेद्वारे १६ हजार युनिट विजेची निर्मिती- आजच्या जीवनामध्ये ऊर्जेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. ऊर्जेच्या पारंपरिक आणि अपारंपरिक साधनांचा काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या ऊर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. हाच धागा पकडून सोलापूर रेल्वे विभागाने सोलापूर विभागात ४ हजार ४०० एलईडी बल्ब लावले आहेत़ ज्यातून वर्षाला १३ लाख ८ हजार ७८० युनिटची बचत रेल्वेची होत आहे़ शिवाय भैय्या चौकात असलेल्या रेल्वे हॉस्पिटलवर १० किलो मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे वर्षाकाठी १६ हजार युनिटचे उत्पादन होत आहे़ ज्यामुळे १ लाख ४४ हजार रुपयांची बचत होत असल्याचेही व्ही. के. नागर यांनी सांगितले.

वृक्षसंवर्धनाला प्राधान्य- आपण निसर्गाचे काहीतरी देणं लागतो, या बांधिलकीतून सोलापूर रेल्वे विभागाने विभागांतर्गत येणाºया विविध रेल्वे स्टेशनवर वर्षभरात ७५ हजार झाडे लावली आहेत़ या झाडांचे संगोपन व निगा राखण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाºयांनी घेतल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के़ नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रेल्वे विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत़ भविष्यात १० रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प व ६ नवे पाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभाकरण्याचा मानस आहे़ लवकरच या कामांना सुरुवात होईल- व्ही़. के़ नागर, अपर रेल्वे मंडल प्रबंधक, सोलापूर विभाग

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ