शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 20:21 IST

Veer Savarkar Defamation Case On Rahul Gandhi: दोनदा समन्स बजावले, राहुल गांधी गैरहजर राहिले; आता अटक वॉरंट निघणार? नेमके प्रकरण काय?

Veer Savarkar Defamation Case On Rahul Gandhi: वीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. परंतु, समन्स बजावूनही राहुल गांधी उपस्थित राहत नसल्यामुळे आता कठोर कारवाई करण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावणीस हजर होण्यासाठी १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

राहुल गांधी हे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर होते. येथील न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे. मात्र, दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असे राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत मुदतवाढ दिली होती. तर, सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. अनेक महत्त्वपूर्ण विधेयके संसदेत चर्चेसाठी येणार आहेत. राहुल गांधी हे एका महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांनी लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधी यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून न्यायालयात उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. त्यानुसार हजर राहण्याबाबत पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली आहे. 

सात्यकी सावरकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चुलत नातू आणि नारायण सावकर यांचा सख्खा नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबत माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले की, वीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणात २०२३ मध्ये मी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. यासंदर्भात आज एक सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. ०२ डिसेंबरला राहुल गांधी यांनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी ऑर्डरही काढली होती. परंतु, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे राहुल गांधी उपस्थित राहू शकले नाही, असा बचाव त्यांच्या वकिलांनी केला, अशी माहिती सात्यकी सावरकर यांनी दिली.

संविधान घेऊन सर्व सभांमध्ये जातात, पण न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत

वीर सावरकर यांची बदनामी ही आमच्या संपूर्ण सावरकर कुटुंबासाठी चिंतेची बाब आहे. गंभीर बाब आहे. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतलेली आहे. वीर सावरकर यांचे समर्थक आहेत, त्यांच्या तीव्र भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. समन्स बजावूनही राहुल गांधी न्यायालयासमोर येत नसतील, तर ते जे संविधान घेऊन सर्व सभांमध्ये जात असतात. सगळ्या सभांमध्ये संविधानाच्या बाजूने बोलत असतात. संविधानरक्षक सभा घेतात. त्याला काहीही अर्थ उरत नाही. न्यायालय हा लोकशाहीचा स्तंभ आहे. न्यायपालिकेचा आदर आपण केला पाहिजे. परंतु, राहुल गांधी यांच्या वर्तनावरून असे दिसून येत आहे की, न्यायालयाचे आदेश ते पाळत नाहीत, अशी टीका सात्यकी सावरकर यांनी केली.

दरम्यान, राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत म्हणून त्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे, तसेच कलम १७४ तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व्हावी, असा अर्ज दाखल केला आहे. यापुढील सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे. राहुल गांधी यांना दोन वेळा समन्स बजावले होते. पुढील तारखेला न्यायालयात उपस्थितीत राहिले नाही तर न्यायालय कठोर कारवाई करेल. राहुल गांधी पुन्हा अनुपस्थित राहिले, तर मात्र त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाऊ शकते, अशी माहिती आमच्या वकिलांनी आम्हाला दिली, असे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस