शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:07 IST

सीमावर्ती भागात अतिक्रमण; महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष

- शंकर चव्हाण चंद्रपूर : महाराष्ट्र आणितेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या १४ गावांच्या हद्दीचा वाद न सोडविला गेल्यामुळे तेलंगणाचे प्रशासकीय अतिक्रमण वाढू लागले आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या या १४ मराठी भाषिक गावात तेलंगणाने चक्क निवडणुका घेऊन आपले सरपंच निवडले आहेत. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडला.जिवती तालुक्यातील परमडोली, परमडोली तांडा, महाराजगुडा, कोठा, शंकरलोधी, लेंडीजाळा, लेंडीगुडा, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, मुकादमगुडा, येसापूर, पळसगुडा, भोलापठार ही महसुली गावे महाराष्ट्रात असून सर्वोच्च न्यायालयानेसुध्दा यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी तेलंगण राज्य या गावांवरचा ताबा सोडायला तयार नाही. तेलंगणाच्या या अतिक्रमाबाबत या गावातील नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला, सरकारला निवेदने दिली. पण महाराष्ट्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही गावे नेमकी कोणत्या राज्यात, तेलंगणा की महाराष्ट्रात? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.दोन्ही राज्यांचे प्रशासन करते कामचौदा गावात दोन्ही राज्यांचे प्रशासन काम करते. दोन्ही राज्यातील निवडणुकीत इथल्या ग्रामस्थांना मतदान करावे लागते. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीतही येथे मतदान घेण्यात आले. एकीकडे महाराष्टÑ सरकारचे दुर्लक्ष, तर दुसरीकडे तेलंगण सरकारचे विशेष लक्ष अशा कात्रीत ही गावे अडकली आहेत. तेलंगण सरकार येथे विविध योजना राबवित आहेत.

टॅग्स :sarpanchसरपंचMaharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा