शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

मराठी साहित्य संमेलनात सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन होणार नाही? कर्तृत्ववान महिलांचे होणार प्रतिमापूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:43 IST

Marathi Sahitya Sammelan: नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई आंबेडकर, फातिमा शेख या सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने करण्याचे नियोजन केले जात असल्याचे समजते.

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई आंबेडकर, फातिमा शेख या सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने करण्याचे नियोजन केले जात असल्याचे समजते. मात्र, सरस्वतीला विद्येची देवता मानले जात असल्याने तिच्या पुत्रांचा म्हणून जो सारस्वतांचा मेळा भरवला जातो, त्या साहित्य संमेलनात सरस्वतीपूजनासह दीपप्रज्वलनाच्या परंपरेचे पालन होणार का? त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यास निमंत्रकांनी नकार दिला आहे.

कोणत्याही सांस्कृतिक, साहित्यिक मेळावा तसेच साहित्य संमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने करण्याची आजवरची प्रथा, परंपरा आहे. मात्र, नाशकात होऊ घातलेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने होणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात सरस्वतीपूजनाला फाटा दिला जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

साहित्य संमेलन अथवा कोणत्याही कार्याचा शुभारंभ देवदेवतांच्या पूजनाने होतो. त्याचप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सरस्वतीपूजनाने करण्याची आजवरची परंपरा आहे. नाशकात होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी होणार असून, त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे. विविध समित्यांच्या बैठका, नियोजनाची धावपळ आणि उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असतानाच दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाल्याने संमेलनात मतभेदाची दरी निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे साहित्य वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

वादात पडणार भरसाहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेतील कार्यक्रमांमध्ये केलेले बदल, संमेलनात राजकारण्यांचा व्यासपीठावर सहभाग तसेच सभामंडपासह व्यासपीठाला सावरकर यांचे नाव देण्याबाबतच्या मागणीवर चाललेली टाळाटाळ, यासह विविध भूमिकांवरून वाद सुरू असतानाच सरस्वती प्रतिमापूजन होणार की नाही? दीपप्रज्वलनाला फाटा दिला जाणार का? अशा चर्चांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 संमेलनात सरस्वतीपूजन करायचे किंवा कसे याबाबत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विचारविनिमय करून उद्या निर्णय घेतला जाणार आहे. तसेच डॉ. नारळीकर हे संमेलनाध्यक्ष वैज्ञानिक असल्याने दीपप्रज्वलन करायचे किंवा कसे? याबाबत संमेेलनाध्यक्षांना विचारून निर्णय घेण्यास सांगितले असल्याने संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. - जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक