शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मराठी साहित्य संमेलनात सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन होणार नाही? कर्तृत्ववान महिलांचे होणार प्रतिमापूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:43 IST

Marathi Sahitya Sammelan: नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई आंबेडकर, फातिमा शेख या सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने करण्याचे नियोजन केले जात असल्याचे समजते.

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई आंबेडकर, फातिमा शेख या सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने करण्याचे नियोजन केले जात असल्याचे समजते. मात्र, सरस्वतीला विद्येची देवता मानले जात असल्याने तिच्या पुत्रांचा म्हणून जो सारस्वतांचा मेळा भरवला जातो, त्या साहित्य संमेलनात सरस्वतीपूजनासह दीपप्रज्वलनाच्या परंपरेचे पालन होणार का? त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यास निमंत्रकांनी नकार दिला आहे.

कोणत्याही सांस्कृतिक, साहित्यिक मेळावा तसेच साहित्य संमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने करण्याची आजवरची प्रथा, परंपरा आहे. मात्र, नाशकात होऊ घातलेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने होणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात सरस्वतीपूजनाला फाटा दिला जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

साहित्य संमेलन अथवा कोणत्याही कार्याचा शुभारंभ देवदेवतांच्या पूजनाने होतो. त्याचप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सरस्वतीपूजनाने करण्याची आजवरची परंपरा आहे. नाशकात होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी होणार असून, त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे. विविध समित्यांच्या बैठका, नियोजनाची धावपळ आणि उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असतानाच दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाल्याने संमेलनात मतभेदाची दरी निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे साहित्य वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

वादात पडणार भरसाहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेतील कार्यक्रमांमध्ये केलेले बदल, संमेलनात राजकारण्यांचा व्यासपीठावर सहभाग तसेच सभामंडपासह व्यासपीठाला सावरकर यांचे नाव देण्याबाबतच्या मागणीवर चाललेली टाळाटाळ, यासह विविध भूमिकांवरून वाद सुरू असतानाच सरस्वती प्रतिमापूजन होणार की नाही? दीपप्रज्वलनाला फाटा दिला जाणार का? अशा चर्चांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 संमेलनात सरस्वतीपूजन करायचे किंवा कसे याबाबत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विचारविनिमय करून उद्या निर्णय घेतला जाणार आहे. तसेच डॉ. नारळीकर हे संमेलनाध्यक्ष वैज्ञानिक असल्याने दीपप्रज्वलन करायचे किंवा कसे? याबाबत संमेेलनाध्यक्षांना विचारून निर्णय घेण्यास सांगितले असल्याने संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. - जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक