शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"धनंजय मुंडे यांच्या एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, तर...!" नाना पटोले स्पष्टच बोलले, केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:02 IST

"सरकारकडे जर कणभर संवेदना आणि माणुसकी उरली असेल, तर..."

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्यात संतापाची लाट आहे. नुकतेच त्यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओदेखील समोर आले आहेत. हे फटो आणि व्हिडिओ कुणाचाही थरकाप उडवणारे आहेत. यावरून संतोष देशमुख यांची कीती क्रूरपणे हत्या करण्यात आली, हे प्राथमिकदृष्ट्या लक्षात येते. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. यासंदर्भात त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. अखेर आज मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यातच, आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी, "फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. एवढेच नाही तर, धनंजय मुंडे यांच्या केवळ एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, असेही पटोले यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "काल स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे प्रसारमाध्यमांमध्ये आलेले फोटो पाहून मनाला अतिशय वेदना झाल्या. मारेकऱ्यांनी क्रूरतेची परिसीमा ओलांडली असून, त्यांच्या राक्षसी कृत्याने कुणाच्याही काळजाचा ठोका चुकावा. तब्बल 80 दिवस हत्येचे पुरावे सरकारकडे असतानाही, सरकारने काहीच कारवाई केली नाही. या संवेदनहीनतेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे." 

पटोले यांनी पुढे म्हटले आहे, "संस्कृती आणि माणुसकी जोपासणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येने काळिमा फासला आहे. आज राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सरकारकडे जर कणभर संवेदना आणि माणुसकी उरली असेल, तर या हत्याकांडातील सर्व सूत्रधारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. धनंजय मुंडे यांच्या केवळ एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील." 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDhananjay Mundeधनंजय मुंडेcongressकाँग्रेसSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण