शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

संतोष देशमुख हत्या : बीडच्या पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली, फडणवीसांनी सांगितलं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:17 IST

Devendra Fadnavis Santosh Deshmukh Murder: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांची बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 

Santosh deshmukh sarpanch CM Devendra Fadnavis: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पहिल्या दिवसांपासून उमटत आहेत. या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याचे विधानसभेत सांगितले. त्याचबरोबर बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या तारांनी संतोष देशमुख यांना बांधले होते, त्याचे फोटोही सभागृहात दाखवले. या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, मग भूमाफिया असेल, तरी त्यांच्यावर मकोका लावू, असा इशारा फडणवीसांनी दिला.

गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढणार आणि मकोका लावणार -फडणवीस

फडणवीस म्हणाले की, "मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितलं की, यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय, हे बघायला पाहिजे. मधल्या काळात हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात. हे यापुढे सहन केले जाणार नाही, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो."

"या बीड जिल्ह्यात अशाप्रकारे गुन्हेगारी करणारे जे कोणी असतील. त्यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांना ३०२ तर लागेलच, सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत, हे सगळे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात येईल", अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली. 

उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करणार; फडणवीसांचा इशारा

डणवीस पुढे म्हणाले की, "दुरान्वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा मदत करताहेत, असे निष्पन्न झालं, तर त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मकोकामध्ये टाकण्यात येईल. आणि बीड जिल्ह्यात वाळू माफिया, वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे जे लोक आहेत. एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल." 

"हे जे सगळं प्रकरण आहे, त्यात दोन प्रकार चौकशी आम्ही करणार आहोत. एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची केली जाईल. ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू. जी प्रकरणे समोर येत आहेत, त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार