शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संत निवृत्तीनाथ पालखीचे एसटीने फाडले तिकीट! परिवहन महामंडळाची असंवेदनशीलता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 06:42 IST

अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. त्यामुळे एरवी लोकसहभागातून कसलाही खर्च न होता होणारी निवृत्तीनाथांची पायी वारी यावर्षी मात्र सशुल्क करावी लागली. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी त्यानिमित्ताने समोर आली आहे.

यंदा कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असे सुरूवातीला सांगण्यात आले होते. काही संतांच्या पालखीसाठी हेलिकॉप्टरचीही चर्चा झडली होती. त्यामुळे शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असाच समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला होता. परंतु सोमवारपर्यंत शासनाकडून कसलेही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.आम्ही दोन-तीन वेळा पत्र देऊन शासनानेच स्वखर्चाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केलेली होती. परंतु, दोन-तीन बैठकांमध्ये महामंडळाने त्याबाबत असमर्थता दर्शविली. अखेर संस्थानने प्रवासभाडे भरले. - पवनकुमार भुतडा, अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ संस्थान, त्र्यंबकेश्वरनाथांच्या पादुकाही मार्गस्थपैठण (जि. औरंगाबाद) : आषाढीवारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पादुका परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने मंगळवारी नाथ मंदिरातून रवाना झाल्या. १८ दिवसांपासून नाथांच्या पादुका नाथ मंदिरात मुक्कामी होत्या. रोहयो तथा फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे व पालखी प्रमुख रघुनाथ महाराजांच्या हस्ते पादुका शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आल्या.पायी वारी काढण्यास उच्च न्यायालयाचा नकारमुंबई : संत तुकाराम महाराज म्हणतात की, विठ्ठल सर्वत्र आहेत. त्यामुळे जिथे आहात तिथेच त्याची पूजा करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने वाखरी ते पंढरपूर असा सहा किमीचा प्रवास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीची याचिका मंगळवारी फेटाळण्यात आली. पंढरपूरमध्ये १० लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात नगर प्रदक्षिणाच्या ठिकाणी एक व्यक्ती बाधित आहे. खुद्द उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहन चालकास कोरोना झाला आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करून घेऊ इच्छित नाही, असे उच्च न्यायालयाने सांगितले. जगन्नाथ पुरी रथ यात्रेच्या परवानगीनंतर ही याचिका दाखल झाली होती.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी