शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जय जय रामकृष्ण हरी, माऊलींची पालखी आषाढी वारीसाठी वीस जणांसह शिवनेरी बसने पंढरपूरला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 16:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे खबरदारी म्हणून यंदाचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला मिळाले पत्र पादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून शिवनेरी बस उपलब्ध करून दिली जाणारपादुकासोबत येणाऱ्या व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जाणार आषाढी वारीत संतांच्या पादुकांसोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार असणार

आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका येत्या मंगळवारी (दि.३०) आळंदीतून पंढरपूरला अवघ्या वीस व्यक्तींसोबत शिवनेरी बसद्वारे नेण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला आज प्राप्त झाले आहे. कडक पोलीस बंदोबस्तात जाणाऱ्या वारीची उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

      कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून यंदाचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका पंढरीत नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली होती. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला तर तीर्थक्षेत्र आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे पन्नास वारकऱ्यांच्या उपस्थित प्रस्थान करण्यात आले. मात्र त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू व आळंदीतच मुक्कामी आहेत. 
                   यापार्श्वभूमीवर पादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून शिवनेरी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बसमध्ये फक्त वीस व्यक्तींना पादुकांसोबत जाण्याची परवानगी दिली असून सोबत पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. विशेष म्हणजे पादुकांसोबत साठ वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती नसावी. तसेच कोणत्याही स्वरूपाचा आजार नसावा. पादुकासोबत येणाऱ्या व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. ...........................      शिवनेरी बसने होणाऱ्या आषाढी वारीत संतांच्या पादुकांसोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार असणार आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्यावर पादुका पंढरपूरला नेण्याची आणि पुन्हा माघारी आळंदीला आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून आळंदी ते पंढरीच्या प्रवासात पादुका कोठेही थांबणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :AlandiआळंदीState Governmentराज्य सरकारPandharpur Wariपंढरपूर वारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस