शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जय जय रामकृष्ण हरी, माऊलींची पालखी आषाढी वारीसाठी वीस जणांसह शिवनेरी बसने पंढरपूरला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 16:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे खबरदारी म्हणून यंदाचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला मिळाले पत्र पादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून शिवनेरी बस उपलब्ध करून दिली जाणारपादुकासोबत येणाऱ्या व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जाणार आषाढी वारीत संतांच्या पादुकांसोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार असणार

आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका येत्या मंगळवारी (दि.३०) आळंदीतून पंढरपूरला अवघ्या वीस व्यक्तींसोबत शिवनेरी बसद्वारे नेण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला आज प्राप्त झाले आहे. कडक पोलीस बंदोबस्तात जाणाऱ्या वारीची उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

      कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून यंदाचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका पंढरीत नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली होती. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला तर तीर्थक्षेत्र आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे पन्नास वारकऱ्यांच्या उपस्थित प्रस्थान करण्यात आले. मात्र त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू व आळंदीतच मुक्कामी आहेत. 
                   यापार्श्वभूमीवर पादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून शिवनेरी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बसमध्ये फक्त वीस व्यक्तींना पादुकांसोबत जाण्याची परवानगी दिली असून सोबत पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. विशेष म्हणजे पादुकांसोबत साठ वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती नसावी. तसेच कोणत्याही स्वरूपाचा आजार नसावा. पादुकासोबत येणाऱ्या व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. ...........................      शिवनेरी बसने होणाऱ्या आषाढी वारीत संतांच्या पादुकांसोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार असणार आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्यावर पादुका पंढरपूरला नेण्याची आणि पुन्हा माघारी आळंदीला आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून आळंदी ते पंढरीच्या प्रवासात पादुका कोठेही थांबणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :AlandiआळंदीState Governmentराज्य सरकारPandharpur Wariपंढरपूर वारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस