शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत संपन्न करावा : जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 19:21 IST

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला (दि. १३) होणार

ठळक मुद्दे निदेर्शांचे पालन करणे अनिवार्यशासन नियमावली अधीन राहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा संपन्न केला जाणार प्रस्थान सोहळ्याला मंदिरात प्रवेश दिला जाणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार

आळंदी (शेलपिंपळगाव) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळयास शनिवारी  (दि.१३) मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत व उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.               कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर यंदा संत ज्ञानेश्वर माउलींचा पायीवारी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत. मात्र राज्य शासनाच्या सूचनेनुसार आळंदीतील माउलींचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शनिवारी (दि. १३) होत आहे.                यापार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळा संपन्न करण्यासाठी किमान पन्नास जणांच्या उपस्थितीतीची परवानगी देवस्थानने प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे मागितली होती. त्यानुसार आज (दि.११) प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्याची तयारी करण्याचा देवस्थानचा मार्ग मोकळा झाला आहे.        दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.

............................

" शासनाने दिलेल्या नियमावलीत अधीन राहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा संपन्न केला जाणार आहे.  प्रस्थान सोहळ्याला मंदिरात प्रवेश दिला जाणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. चालू वर्षी कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांनीही देवस्थानला सहकार्य करावे.''       - अ‍ॅड. विकास ढगे - पाटील, प्रमुख विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी.

टॅग्स :AlandiआळंदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीState Governmentराज्य सरकार