शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:46 IST

आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले.

मुंबई - पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील अशी ऑफर भाजपाने दिली होती. मात्र तरीही ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. एकनाथ शिंदेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. 

संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं ठरलं, त्यावेळी आम्ही सगळे मातोश्रीवर होतो. आम्ही डोळ्यासमोर पाहत होतो. २०१९ ला निकालात शिवसेना-भाजपा बहुमत आले होते. सर्वकाही ठरले होते, अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद यावरही भाजपाने पहिली अडीच वर्ष तुमची हे मान्य केले. परंतु कुणीतरी एक जण चर्चेला पाठवा. परंतु चर्चेला माणूस पाठवला नाही. तुला जायचं तर तू जा असं एकनाथ शिंदेंना म्हटलं. हे सर्व आधीच ठरले होते, भाजपासोबत जायचंच नाही मग इतका आटापिटा कशासाठी केला होता असा सवाल शिरसाटांनी उपस्थित केला. पदासाठीच हे सर्व केले, त्याला कारणीभूत संजय राऊत असा आरोपही शिरसाटांनी केला. 

तर संजय शिरसाट यांच्यासारखा बदमाश माणसाने सांगावे, त्यावर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा. ही माणसे गुवाहाटीला गेली, वेगवेगळी कारणे देऊन बाहेर पडली. एकही कारण लोकांना पटत नाही त्यामुळे अशा वाचाळवीरांवर बोलू नये. बोलण्याचे संकेत ज्यांना कळत नाही एखाद्या खासदाराला एकेरी बोलू शकतात त्यावर न बोललेले बरं असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाटांना लगावला आहे. एबीपीनं याबाबत वृत्त दिले आहे. 

परतीचे दोर कापायला तुमच्याकडे येणार कोण?

परतीचे दोर कापायला तुमच्याकडे कुणी आले पाहिजे, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे लाचारांची फौज तयार झालीय. प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरू आहे. जो पक्ष डुबतोय त्याकडे कुणी जात नाही. एखादा नगरसेवक, कार्यकर्ता गेला तोदेखील उमेदवारीचं तिकीट घेऊन, त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही. लाचारांची ही फौज तयार झालीय. शिवसेनाप्रमुखाच्या स्वाभिमानाची फौज होती ती आता नाही. हे केवळ लाचारी करून पदरात काय पडेल ते घेणे एवढेच उबाठाचे काम आहे. येणारी विधानसभा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

महायुतीत वाद नाहीत, बच्चू कडू अंहकारी बनलेत

निवडणुकीच्या काळात काही जागा मागितल्या जातात पण मागणी केली म्हणून जागा सोडल्या असं होत नाही. वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. बच्चू कडू यांनी असं बोलणं योग्य नाही. ते अहंकारी भाषेत बोलायला लागलेत. आम्ही जेव्हा उठाव केला तुम्ही आमच्यासोबत आलात. प्रत्येक पक्षात कुणीतरी येते आणि जाते तुमचा माणूस तुम्हाला का सांभाळता आला नाही हे चिंतन करा असंही शिरसाटांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी