शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:46 IST

आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले.

मुंबई - पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील अशी ऑफर भाजपाने दिली होती. मात्र तरीही ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. एकनाथ शिंदेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. 

संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं ठरलं, त्यावेळी आम्ही सगळे मातोश्रीवर होतो. आम्ही डोळ्यासमोर पाहत होतो. २०१९ ला निकालात शिवसेना-भाजपा बहुमत आले होते. सर्वकाही ठरले होते, अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद यावरही भाजपाने पहिली अडीच वर्ष तुमची हे मान्य केले. परंतु कुणीतरी एक जण चर्चेला पाठवा. परंतु चर्चेला माणूस पाठवला नाही. तुला जायचं तर तू जा असं एकनाथ शिंदेंना म्हटलं. हे सर्व आधीच ठरले होते, भाजपासोबत जायचंच नाही मग इतका आटापिटा कशासाठी केला होता असा सवाल शिरसाटांनी उपस्थित केला. पदासाठीच हे सर्व केले, त्याला कारणीभूत संजय राऊत असा आरोपही शिरसाटांनी केला. 

तर संजय शिरसाट यांच्यासारखा बदमाश माणसाने सांगावे, त्यावर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा. ही माणसे गुवाहाटीला गेली, वेगवेगळी कारणे देऊन बाहेर पडली. एकही कारण लोकांना पटत नाही त्यामुळे अशा वाचाळवीरांवर बोलू नये. बोलण्याचे संकेत ज्यांना कळत नाही एखाद्या खासदाराला एकेरी बोलू शकतात त्यावर न बोललेले बरं असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाटांना लगावला आहे. एबीपीनं याबाबत वृत्त दिले आहे. 

परतीचे दोर कापायला तुमच्याकडे येणार कोण?

परतीचे दोर कापायला तुमच्याकडे कुणी आले पाहिजे, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे लाचारांची फौज तयार झालीय. प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरू आहे. जो पक्ष डुबतोय त्याकडे कुणी जात नाही. एखादा नगरसेवक, कार्यकर्ता गेला तोदेखील उमेदवारीचं तिकीट घेऊन, त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही. लाचारांची ही फौज तयार झालीय. शिवसेनाप्रमुखाच्या स्वाभिमानाची फौज होती ती आता नाही. हे केवळ लाचारी करून पदरात काय पडेल ते घेणे एवढेच उबाठाचे काम आहे. येणारी विधानसभा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

महायुतीत वाद नाहीत, बच्चू कडू अंहकारी बनलेत

निवडणुकीच्या काळात काही जागा मागितल्या जातात पण मागणी केली म्हणून जागा सोडल्या असं होत नाही. वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. बच्चू कडू यांनी असं बोलणं योग्य नाही. ते अहंकारी भाषेत बोलायला लागलेत. आम्ही जेव्हा उठाव केला तुम्ही आमच्यासोबत आलात. प्रत्येक पक्षात कुणीतरी येते आणि जाते तुमचा माणूस तुम्हाला का सांभाळता आला नाही हे चिंतन करा असंही शिरसाटांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी