शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ममतांचा 'तो' प्रश्न योग्य, पण काँग्रेसला दूर ठेवून आघाडी होऊ शकत नाही; राऊतांचा दिदींना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 13:30 IST

आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही.

 ‘यूपीए आता आहेच कुठे? यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’चे अस्तित्वच नाकारले. तसेच, त्या ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी बुधवारी हे भाष्य केले. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ममता या देशातील मोठ्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री आणि भाजप विरोधातील या लढाईत त्या महत्वाच्या योद्धा आहेत. त्यांचा लढा प्रेरणादायी आहे. युपीए कुठे आहे? हा ममतांचा प्रश्न योग्य आहे," असे राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut's valuable advice to Mamata Banerjee)

राऊत म्हणाले, "ममतांप्रमाणेच ऊद्धव ठाकरेंनीही असाच प्रश्न विचारला आहे. युपीए आक्रमक व्हायला हवे. जर युपीए नाही, तर एनडीए तरी कुठे आहे, असेही ऊद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत तिसरी आणि चौथी आघाडी बनली, त्याचा फायदा भाजपला झाला. मग ही जी आघाडी उभी राहत आहे त्याचा काय फायदा होईल? याचा विचार करायला हवा. आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही. इतर राज्यांत कांग्रेसचा बेस आहे. सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असे आमचे म्हणणे आहे."

राज्यात महाविकास आघाडी ही युपीएचाच एक भाग आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे, आम्ही त्यांच्या लढ्याचा आदर करतो. पवार साहेबांनीही म्हटले आहे, की भाजपला रोखले पाहीजे. आम्ही पुन्हा ममतांना भेटू आणि त्यांनाही यासंदर्भात समजून सांगू. सोनिया गांधींच्या नेतृत्वावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही. चर्चा करून यावर तोडगा काढू. आत्ता सुरवात झाली आहे. ऊद्धवजींशी चर्चा करू. आम्ही विचार ठेवला होता की, काँग्रेसला घेऊन सोबतच पुढे जायचे. कारण काँग्रेसला सोडले तर मतांचे विभाजन होईल," असेही राऊत म्हणाले.

सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच -यावेळी, सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. त्यांचा विचार बाळासाहेबांनीच पुढे नेला. हिंदूत्वाबद्दल आम्ही कधीही यू टर्न घेतलेला नाही. तुम्ही सांगा, तुम्ही सावरकरांना का भारत रत्न देत नाही, असा सवालही राऊत यांनी भाजपला केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना