शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

ममतांचा 'तो' प्रश्न योग्य, पण काँग्रेसला दूर ठेवून आघाडी होऊ शकत नाही; राऊतांचा दिदींना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 13:30 IST

आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही.

 ‘यूपीए आता आहेच कुठे? यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’चे अस्तित्वच नाकारले. तसेच, त्या ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी बुधवारी हे भाष्य केले. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ममता या देशातील मोठ्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री आणि भाजप विरोधातील या लढाईत त्या महत्वाच्या योद्धा आहेत. त्यांचा लढा प्रेरणादायी आहे. युपीए कुठे आहे? हा ममतांचा प्रश्न योग्य आहे," असे राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut's valuable advice to Mamata Banerjee)

राऊत म्हणाले, "ममतांप्रमाणेच ऊद्धव ठाकरेंनीही असाच प्रश्न विचारला आहे. युपीए आक्रमक व्हायला हवे. जर युपीए नाही, तर एनडीए तरी कुठे आहे, असेही ऊद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत तिसरी आणि चौथी आघाडी बनली, त्याचा फायदा भाजपला झाला. मग ही जी आघाडी उभी राहत आहे त्याचा काय फायदा होईल? याचा विचार करायला हवा. आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही. इतर राज्यांत कांग्रेसचा बेस आहे. सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असे आमचे म्हणणे आहे."

राज्यात महाविकास आघाडी ही युपीएचाच एक भाग आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे, आम्ही त्यांच्या लढ्याचा आदर करतो. पवार साहेबांनीही म्हटले आहे, की भाजपला रोखले पाहीजे. आम्ही पुन्हा ममतांना भेटू आणि त्यांनाही यासंदर्भात समजून सांगू. सोनिया गांधींच्या नेतृत्वावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही. चर्चा करून यावर तोडगा काढू. आत्ता सुरवात झाली आहे. ऊद्धवजींशी चर्चा करू. आम्ही विचार ठेवला होता की, काँग्रेसला घेऊन सोबतच पुढे जायचे. कारण काँग्रेसला सोडले तर मतांचे विभाजन होईल," असेही राऊत म्हणाले.

सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच -यावेळी, सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. त्यांचा विचार बाळासाहेबांनीच पुढे नेला. हिंदूत्वाबद्दल आम्ही कधीही यू टर्न घेतलेला नाही. तुम्ही सांगा, तुम्ही सावरकरांना का भारत रत्न देत नाही, असा सवालही राऊत यांनी भाजपला केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना