शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ममतांचा 'तो' प्रश्न योग्य, पण काँग्रेसला दूर ठेवून आघाडी होऊ शकत नाही; राऊतांचा दिदींना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 13:30 IST

आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही.

 ‘यूपीए आता आहेच कुठे? यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’चे अस्तित्वच नाकारले. तसेच, त्या ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी बुधवारी हे भाष्य केले. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ममता या देशातील मोठ्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री आणि भाजप विरोधातील या लढाईत त्या महत्वाच्या योद्धा आहेत. त्यांचा लढा प्रेरणादायी आहे. युपीए कुठे आहे? हा ममतांचा प्रश्न योग्य आहे," असे राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut's valuable advice to Mamata Banerjee)

राऊत म्हणाले, "ममतांप्रमाणेच ऊद्धव ठाकरेंनीही असाच प्रश्न विचारला आहे. युपीए आक्रमक व्हायला हवे. जर युपीए नाही, तर एनडीए तरी कुठे आहे, असेही ऊद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत तिसरी आणि चौथी आघाडी बनली, त्याचा फायदा भाजपला झाला. मग ही जी आघाडी उभी राहत आहे त्याचा काय फायदा होईल? याचा विचार करायला हवा. आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही. इतर राज्यांत कांग्रेसचा बेस आहे. सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असे आमचे म्हणणे आहे."

राज्यात महाविकास आघाडी ही युपीएचाच एक भाग आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे, आम्ही त्यांच्या लढ्याचा आदर करतो. पवार साहेबांनीही म्हटले आहे, की भाजपला रोखले पाहीजे. आम्ही पुन्हा ममतांना भेटू आणि त्यांनाही यासंदर्भात समजून सांगू. सोनिया गांधींच्या नेतृत्वावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही. चर्चा करून यावर तोडगा काढू. आत्ता सुरवात झाली आहे. ऊद्धवजींशी चर्चा करू. आम्ही विचार ठेवला होता की, काँग्रेसला घेऊन सोबतच पुढे जायचे. कारण काँग्रेसला सोडले तर मतांचे विभाजन होईल," असेही राऊत म्हणाले.

सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच -यावेळी, सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. त्यांचा विचार बाळासाहेबांनीच पुढे नेला. हिंदूत्वाबद्दल आम्ही कधीही यू टर्न घेतलेला नाही. तुम्ही सांगा, तुम्ही सावरकरांना का भारत रत्न देत नाही, असा सवालही राऊत यांनी भाजपला केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना