शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maratha Reservation भुजबळ-जरांगे पाटलांना संजय राऊतांचा मोलाचा सल्ला; "शिवरायांच्या महाराष्ट्रात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:48 IST

आज राज्यात जातीजातीत भांडणे लावून एकमेकांचे हातपाय तोडू अशी भाषा वापरणे हे दुर्दैव आहे. या राज्यातील सरकारला कुणी जुमानत नाही असा आरोप त्यांनी केला. 

मुंबई - Maratha Reservation आरक्षणासारखे विषय एकत्र बसून त्यातून निर्णय घेण्याची गरज आहे. मग छगन भुजबळ असतील, जरांगे पाटील असतील, अन्य प्रमुख नेते. तुम्ही भाषणे आणि एकमेकांना आव्हान कसली देताय? तुम्ही दिलेले आव्हान हे महाराष्ट्राच्या मूळावर येतंय.महाराष्ट्राच्या सामाजिक अखंडतेवर एकत्र येतंय. त्यासाठी सर्वांनी एकत्र बसले पाहिजे आणि यातून मार्ग काढला पाहिजे.अशाप्रकारे तुमचे नेतृत्व, तुम्हाला टाळ्या मिळतील, तुमच्या जयजयकाराच्या घोषणा होतील. पण बाळासाहेबांनी जो मंत्र दिला होता, सगळे मतभेद, जातीभेद गाडून मराठी माणसांची एकजूट उभारा आणि ती एकजूट म्हणजे शिवसेना होती हे विसरलेले दिसतायेत असा मोलाचा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, भुजबळांनी गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे त्यावर आता सरकारला बोलू द्या. आता यावर राजकीय पक्षाच्या भूमिका घेतायेत त्याला अर्थ नाही. यावर सरकारने बोलावे. महाराष्ट्रातील वातावरण इतके खराब झालंय की याच कारणासाठी महाराष्ट्र स्थापन केला होता का? १०६ हुताम्यांनी आजचा दिवस पाहण्यासाठी बलिदान दिले होते का? जातीय विष राज्यात कुणी कालवलं नव्हते. समाज एवढा दुभंगला नव्हता. १९४७ च्या वेळी भारत-पाक फाळणी झाली तेव्हा अशी भाषा वापरली जातेय. आज राज्यात जातीजातीत भांडणे लावून एकमेकांचे हातपाय तोडू अशी भाषा वापरणे हे दुर्दैव आहे. या राज्यातील सरकारला कुणी जुमानत नाही असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत या राज्यात बाळासाहेब ठाकरेंनंतर सर्वमान्य नेतृत्व राहिले नाही.बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना प्रिय होते. त्यांचे सगळे ऐकत होते. सगळ्यांना एकत्र बसवण्याची ताकद त्यांच्यात होती.आज दिल्ली असो वा महाराष्ट्र समाज एकसंघ ठेवणारे नेतृत्व राहिले नाही.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आरक्षणावरून एकमेकांचे खून करू, तंगड्या, हातपाय हातात देऊ अशी भाषा दुर्दैवाने पाहावं लागतंय. अशा महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या दुंभगलेला पाहायला मिळतोय अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली. 

आम्ही श्रद्धेने अयोध्येला जाऊ, राजकारणासाठी नाही

येत्या काही दिवसांत २२ जानेवारीचं राजकारण संपल्यावर आम्हीदेखील अयोध्येला जाऊ. श्रद्धेनं जाऊ, राजकारणासाठी जाणार नाही असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यावरून राऊतांनी हे विधान केले. राम मंदिराबाबत शिवसेनेचीच भूमिका होती. राम मंदिराच्या योगदानात आमचाही तितकाच वाटा आहे जितका आज हे लोक श्रेय घेत आहेत. जेव्हा तिथे कुणी छातीवर गोळी घ्यायला तयार नव्हता तेव्हा तिथे शिवसैनिक पोहचले होते. मंदिर निर्माणच्या कार्यात आमचे योगदान होते आणि यापुढेही राहील. आदित्य ठाकरे मथुरेत श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी गेले आहेत. मुथरेत मंदिराचे लोकार्पण होणार असून त्यासाठी आदित्य ठाकरेंना तिथे आमंत्रित केले आहे. त्यामुळे आज ते तिथे गेले आहे असं संजय राऊत म्हणाले. 

मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाही. ४८ जागा आणि उमेदवार ताकदीने लढतील आणि जिंकतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण