शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
4
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
5
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
6
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
7
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
8
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
9
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
10
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
12
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
13
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
14
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
15
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
16
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
17
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
18
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
19
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
20
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:14 IST

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाच प्रश्न विचारले आहेत.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत.  'पाकिस्तानशी कोणतेही द्विपक्षीय क्रीडा संबंध राहणार नाहीत परंतु बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान संघासोबत सामने खेळता येतील', असं सरकारचे म्हणणे आहे.  राऊतांनी पीएम मोदी यांना पत्र लिहून या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. 

'पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू अद्याप थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत सामना खेळणे अत्यंत अमानवीय आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले

"आशिया कपमध्ये पाकिस्तानशी सामना होणे भारतीयांसाठी खूप कठीण आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाच्या मंजुरीशिवाय हे शक्य नव्हते", असे या पत्रात राऊतांनी म्हटले. 

पाकिस्तानसोबत सामने खेळणे हा आपला अपमान - संजय राऊत

"पाकिस्तानसोबत सामने खेळणे हा केवळ सैनिकांचाच नाही तर काश्मीरसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक शहीदांचाही अपमान आहे. हे सामने दुबईमध्ये होत आहेत. जर ते महाराष्ट्रात असते तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने हे होऊ दिले नसते. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा क्रिकेटला प्राधान्य मिळाले आहे. तुमच्या दृष्टीने देशवासीयांच्या भावनांना काहीही किंमत नाही. शिवसेना तुमच्या निर्णयाचा निषेध करते, असे संजय राऊत म्हणाले.

आशिया कप ९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी भारताने आपला संघही जाहीर केला आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी होऊ शकतो. हा सामना दुबईमध्ये खेळवला जाईल.

संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले

"देशवासीयांच्या वतीने त्यांना सरकारसमोर भावना मांडायच्या आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, तर पाकिस्तानशी सामना कसा होऊ शकतो? पहलगाम हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला आणि २६ महिलांचे सिंदूर पुसले, तुम्हाला त्या माता-भगिनींचे दुःख समजले आहे का? तुम्ही म्हणालात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहू शकते का?, असा सवाल राऊतांनी केला.

"पाकिस्तानसोबतच्या सामन्यांमध्ये खूप सट्टेबाजी आणि जुगार होतो. भाजपचे लोकही यात सहभागी आहेत. गुजरातचे जय शाह क्रिकेटशी संबंधित बाबी पाहतात. मग या सामन्यांमधून भाजपला मोठा फायदा होतो का?, असा आरोपही संजय राऊतांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर