शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

...ते सहन झालं नाही, नितीन देसाईंची आत्महत्या; संजय राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 10:57 IST

नितीन देसाईंचे स्वप्न हे मराठी माणसाचे होते. नितीन देसाईंची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई – नितीन देसाईंसारखा कलाकार ज्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा सिनेइंडस्ट्रीत कष्टाने, मेहनतीने उमटवला. या देशातील सर्वात उत्तम स्टुडिओ त्यांनी उभारला. अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा या महान कलाकाराचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू व्हावा. त्यांना मृत्यूला कवटाळावं लागले. नितीन देसाई यांनी आत्महत्या करताना जी व्हाईस नोट आहे ती समोर आणली पाहिजे. जे प्रामाणिक उद्योगपती आहेत त्यांना सध्याच्या काळात कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे देशाला, महाराष्ट्राला कळाले पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, एकाबाजूला या देशातून हजारो कोटी रुपये घेऊन पळतायेत, बँकांना बुडवतायेत. भाजपासोबत जे आहेत अशा लोकांना कर्जमाफी दिली जाते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. परंतु एक हरहुन्नरी मराठी माणूस मात्र कर्ज फेडू शकत नाही. जे स्वप्न एनडी स्टुडिओ विखुरताना दिसतंय हे त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आपल्यासमोर आपले स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसतेय म्हणून आत्महत्या केली. ते देश सोडून पळाले नाही. त्यांनी कुणाला फसवले नाही हे महत्त्वाचे. नितीन देसाईंचे स्वप्न हे मराठी माणसाचे होते. नितीन देसाईंची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी. कर्जतच्या स्टुडिओला चित्रनगरीचा दर्जा द्यावा असंही ते बोलले.

घटनात्मक पदावरील व्यक्तींवर राजकीय दबाव

१६ आमदार कायद्याने अपात्र होतायेत पण त्यांना अपात्र करण्याची हिंमत विधानसभा अध्यक्षांमध्ये दिसत नाही. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद असले तरी सध्या सर्व घटनात्मक पदे राजकीय दबावाखाली काम करतायेत. हे राष्ट्रपती, राज्यपाल यासारख्या अनेक पदांमध्ये दिसून येते. त्यामुळे आम्हाला चंद्रचूड यांच्या खंडपीठातील सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. आम्ही ११ ऑगस्टपर्यंत वाट पाहतोय. आमची कायदेशीर टीम अत्यंत मजबूत आहे. आम्ही आशावादी नाही तर विश्वास आहे. विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय १० व्या सूचीनुसार घ्यावा लागतो. नाहीतर महाराष्ट्रातसुद्धा काही लोकांनी कायद्याचा आणि घटनेचा खून केला अशी इतिहासात नोंद होईल असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला.

जिथं निवडणुका तिथे हिंसाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरबाबत बैठक घ्यावी. मणिपूरचा हिंसाचार ही जागतिक समस्या झाली आहे. सर्व बैठकांना त्यांना वेळ आहे. मग मणिपूर, हरियाणातील हिंसाचारावर संसदेत मोदींनी बोलावे. महाराष्ट्रात द्वेष पसरवणाऱ्या भाषणावर बोलावे. देशात कुठलाही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्या राज्यात निवडणुका येतात तिथे हिंसाचार सुरू होतो. हे लोक कोण आहेत? आम्हीही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. पण याप्रकारचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असं सांगत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाईBJPभाजपा