शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

"आता जन्मभर पराभवाची कारणे सांगत बोटं मोडत बसा"; भाजपाचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:51 IST

शिवसेनेचा राज्यसभा निवडणुकीत पराभव

Sanjay Raut vs BJP Rajya Sabha Elections 2022: शिवेसेनचा राज्यसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या जागेवर पराभव झाला. त्यानंतर आता शिवसेनेचे काही नेते आक्रमकपणे भाजपावर आरोप करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यात अग्रणी आहेत. राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यामुळे पराभव झाल्याचे म्हटले होते. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत अपक्ष आमदार विकले गेल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपसुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असेही राऊत म्हणाले. या साऱ्या आरोपांनंतर भाजपाकडून राऊतांना जोरदार टोला लगावण्यात आला.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर हे शिवसेनेच्या नेत्यांना उत्तर देण्यात कायमच पुढे असतात. संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांत पराभवाची कारणं सांगताना भाजपा नेत्यांवर आरोप केले. त्याला भातखळकर यांनी जोरदार उत्तर दिले. "५६ आमदारांच्या जीवावर पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आलेल्या काहींना चाणक्य बनल्याचा गैरसमज झाला होता. तो यापूर्वी सरला नसेल तर राज्यसभेचे निकाल लागल्यानंतर तरी सरायला हवा. एकदा आणि शेवटची सत्ता मिळाली, आता जन्मभर पराभवाची कारणे सांगत बोटं मोडत बसावं लागणार आहे", असा टोला भातखळकरांनी संजय राऊतांना लगावला.

दरम्यान, संजय राऊत हे पंकजा मुंडे यांच्याबद्दलही बोलले होते. ''आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता आहे. कारण त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच कौटुंबिक नात्याने आम्हाला चिंता वाटणार. राजकारण हे राजकारण्याच्या दिशेने आहे'', अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंच्या राजकीय भवितव्याबाबत काळजी व्यक्त केली. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा