शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Sanjay Raut: '...नाय मातीत गाडलं तर नाव सांगणार नाही'; संजय राऊतांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 12:24 IST

'महाराष्ट्रात भाजपला जमिनीवरुन आस्मानापर्यंत नेलं, आम्ही युतीचा धर्म पाळला.'

मुंबई: काल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आजही मीडियाशी संवाद साधताना राऊतांनी भाजपला थेट आव्हान दिले. 'ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांची चिलखतं चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, तर नाव सांगणार नाही', असा इशाराच त्यांनी दिला.

ईडी, सीबीआय भाजपची चिलखतमीडियाशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, अंगावरती वर्दी असेल तर कुणाच्याही अंगावर जाता येत. आपण सिनेमात पाहतो, वर्दी असलेला कुठलीही बेकायदेशीर कामे करतो. तशी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही भाजपची चिलखत आहेत. ही चिलखत घालून ते लढत असतात. हिंमत असेल तर चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर आम्ही नाव सांगणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्याच्याशी आम्ही ठाम आहोत, असं राऊत म्हणाले.

भाजपला साथ देणाऱ्यांचे हालराऊत पुढे म्हणाले की, युतीत 25 वर्ष सडली हे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं नाही. महाराष्ट्रात भाजपला जमिनीवरून आस्मानापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं. आम्ही युतीचा धर्म पाळला, पण जे झालं ते झालं. काल उद्धव ठाकरेंनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. फक्त शिवसेनाच नाही, तर भाजपसोबत गेलेल्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेला संपवू शकत नाहीआम्ही तुम्हाला घाबरत नाही, काय करणार आहात तुम्ही? आम्ही सगळेच लढत आहोत. खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, तुमचं आयटीफायटी सेल आहे, त्यातून बदनामी कराल किंवा हरेन पंड्यांप्रमाणे गोळी माराल. दुसरं तुम्ही काही करू शकत नाहीत. तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा