शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 5:38 PM

दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिवाळीच्या दिवशी भाजप-शिवसेनेत सत्तास्थापनेबाबत एक बैठक ठरली होती. परंतु त्या बैठकीच्या एका तासापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री'पदाचा कोणताही फॉर्म्युला निवडणुकीच्या आधी ठरला नसल्याचे केलेल्या वक्तव्यामुळे ही बैठक रद्द झाली. असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा दोन्ही पक्षातील सुरु असलेला सत्तासंघर्ष काही थांबायला तयार नाही. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणीवर अडली आहे. मात्र ह्या सर्व वादात दोन्ही पक्षाकडून चर्चेसाठी प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेबाबत या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार होती. ज्यात भाजपकडून महाराष्ट्राचे प्रमुख भूपेंद्र यादव व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई असणार होते. मात्र बैठकीच्या एका तास आधीच मुख्यमंत्री यांनी 'मुख्यमंत्री'पदाचा कोणताही फॉर्म्युला निवडणुकीच्या आधी ठरला नसल्याचे सांगितल्याने ही बैठक रद्द झाली. त्यामुळे पुढे कोणतेही चर्चा होऊ शकली नसल्याचे राऊत म्हणाले.

दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत. तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हा प्रश्न राज्याच्या नेत्यांवर सोपवला आहे. मात्र राज्याचे नेते हा प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले असून त्याला आम्ही जवाबदार नसल्याचे राऊत म्हणाले. चर्चेचे अधिकार भाजपमध्ये कुणाकडे आहे हेच कळत नाही. कारण सर्वच अदृश्य असून पडद्यामागे कोणती पटकथा लिहली जात आहे हे मला माहित नाही. परंतु शिवसेनेची पटकथा तयार असल्याचे सुद्धा राऊत म्हणाले.