शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

Eknath Shinde Sanjay Raut Shivsena BJP: एकनाथ शिंदेच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपा यांच्या पुन्हा युती होणार का? संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:33 IST

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांशी १५ मिनिटं संवाद

Eknath Shinde Sanjay Raut Shivsena BJP: महाविकास आघाडीतील शिवसेनेचे बडे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्रीपासून बंड पुकारलं. शिवसेनेच्या काही भूमिका आणि पक्षातील काही नेत्यांवर असलेल्या नाराजीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे कैफियत त्यांनी मांडली होती. पण तरीही काही तोडगा न निघाल्याने शिवसेनेच्या ३०हून जास्त आमदारांसह त्यांनी गुजरातमधील सुरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. घडलेल्या प्रकारानंतर खडबडून जागी झालेल्या शिवसेनेने एक शिष्टमंडळ एकनाथ शिंदेंशी चर्चेसाठी पाठवलं होतं. त्यावेळी, शिवसेनेने भाजपाशी पुन्हा युती करावी आणि राज्यात युतीचं सरकार आणावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलताना केल्याचे सांगण्यात आले. या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. 

भाजपा आणि शिवसेना यांना २०१९च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मदतीने महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात संजय राऊत अतिशय सक्रियरित्या सहभागी झाले होते. त्यांनी पुन्हा भाजपाशी युती करण्याबाबत काय प्रतिक्रिया दिली पाहा-

"एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून जी चर्चा झाली त्याबद्दल काही बाबी समजल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करावी अशी त्यांची भूमिका आहे हे आज सकाळपासूनच समजलं आहे. आणि शिवसेना हा पक्ष अटी-शर्तींवर चालत नाही. एका विशिष्ट परिस्थितीत शिवसेनेला भाजपापासून दूर व्हावं लागलं. २५ वर्षांची युती ज्या परिस्थितीत तोडावी लागली त्याची एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे. कशाप्रकारे शिवसेनेचा अपमान झाला आणि दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, याविषयी एकनाथ शिंदे यांना कल्पना आहे. त्यामुळे याबद्दल त्यांची नवीन भूमिका काय मला माहिती नाही", अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपाशी शिवसेनेची युती शक्य नाही असे सूचित केले.

दरम्यान, शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सूरतला पोहचले होत. यावेळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून १५ मिनिटे संवाद झाला. त्यात नार्वेकरांच्या फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले. या संवादात एकनाथ शिंदे यांनी 'तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो' असं संतापून म्हणाल्याचे सांगितले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढलं असं का केले? असे खडे सवाल त्यांनी विचारले. 'मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढलं का?', असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा