शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Sanjay Raut Shivsena BJP: एकनाथ शिंदेच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपा यांच्या पुन्हा युती होणार का? संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:33 IST

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांशी १५ मिनिटं संवाद

Eknath Shinde Sanjay Raut Shivsena BJP: महाविकास आघाडीतील शिवसेनेचे बडे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्रीपासून बंड पुकारलं. शिवसेनेच्या काही भूमिका आणि पक्षातील काही नेत्यांवर असलेल्या नाराजीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे कैफियत त्यांनी मांडली होती. पण तरीही काही तोडगा न निघाल्याने शिवसेनेच्या ३०हून जास्त आमदारांसह त्यांनी गुजरातमधील सुरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. घडलेल्या प्रकारानंतर खडबडून जागी झालेल्या शिवसेनेने एक शिष्टमंडळ एकनाथ शिंदेंशी चर्चेसाठी पाठवलं होतं. त्यावेळी, शिवसेनेने भाजपाशी पुन्हा युती करावी आणि राज्यात युतीचं सरकार आणावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलताना केल्याचे सांगण्यात आले. या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. 

भाजपा आणि शिवसेना यांना २०१९च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मदतीने महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात संजय राऊत अतिशय सक्रियरित्या सहभागी झाले होते. त्यांनी पुन्हा भाजपाशी युती करण्याबाबत काय प्रतिक्रिया दिली पाहा-

"एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून जी चर्चा झाली त्याबद्दल काही बाबी समजल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करावी अशी त्यांची भूमिका आहे हे आज सकाळपासूनच समजलं आहे. आणि शिवसेना हा पक्ष अटी-शर्तींवर चालत नाही. एका विशिष्ट परिस्थितीत शिवसेनेला भाजपापासून दूर व्हावं लागलं. २५ वर्षांची युती ज्या परिस्थितीत तोडावी लागली त्याची एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे. कशाप्रकारे शिवसेनेचा अपमान झाला आणि दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, याविषयी एकनाथ शिंदे यांना कल्पना आहे. त्यामुळे याबद्दल त्यांची नवीन भूमिका काय मला माहिती नाही", अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपाशी शिवसेनेची युती शक्य नाही असे सूचित केले.

दरम्यान, शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सूरतला पोहचले होत. यावेळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून १५ मिनिटे संवाद झाला. त्यात नार्वेकरांच्या फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले. या संवादात एकनाथ शिंदे यांनी 'तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो' असं संतापून म्हणाल्याचे सांगितले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढलं असं का केले? असे खडे सवाल त्यांनी विचारले. 'मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढलं का?', असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा