शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

“शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 15:55 IST

Maharashtra Politics: गुन्हा दाखल झाला असला तरी त्या कारवाईला सामोरा जाईन, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Politics: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये नवा उत्साह आल्याचे बोलले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीला यामुळे बळकटी मिळण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाला आहे. अशातच मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकावर गंभीर आरोप करत हे सरकारच बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १६ आमदारच नव्हे संपूर्ण सरकार अपात्र असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही शिंदे, फडणवीस हे बेशरमपणे, निर्लज्जपणे निकाल हा आपल्या बाजूने लागल्याचे सांगत आहेत. हे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याने पोलीस, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव

कोणतेही चुकीचे वक्तव्य केले, असे वाटत नाही. सामान्य माणसाच्या मनातील कायद्याच्या चौकटीतील व्यथा व्यक्त केल्या आहेत. पण माझ्यावर दबाव आणला जात आहे. माझ्यावर काहीही करून माझ्यावर दबाव आणणे? शरण यायला भाग पाडणे? मग शिवसेना सोडायला लावणे, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणे अशा प्रकारची दबाव नीती माझ्यावर केली जात आहे. या दबावाला बळी पडणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील सरकार संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, ज्याला तुम्ही सत्ता संघर्ष म्हणतात, त्यावरून या सरकारमध्ये अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे हे स्पष्ट झाले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या कारवाईला सामोरे जाईन, असे सांगत अशा बेकायदेशीर सरकारचे आदेश कुणी पाळू नये, ते आता बेकायदेशीर ठरतील. बेकायदेशीर आदेशाचे पालन केल्याबद्दल भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना चौकशीला कारवाईला सामोरे जावे लागेल. ही भूमिका मी मांडली. देशभरामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य नेहमी केले जातात. पण वक्तव्य संजय राऊत यांनी केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या पोलिसांवर आले, असा दावा संजय राऊत यांनी केला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSanjay Rautसंजय राऊत