शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

युतीबाबतच्या विधानावरून संजय राऊतांनी टोचले अब्दुल सत्तारांचे कान, म्हणाले, त्यांची अजून हळद उतरायची आहे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:44 IST

Sanjay Raut & Abdul Sattar: Nitin Gadkari यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर Shivsena आणि BJP यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले होते.

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटली होती. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडी करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. असं असलं तर शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा युती होणार का? याची चर्चा सुरू असते. दरम्यान, नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यानंतर आता सत्तारांच्या या विधानावर संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सत्तार हे पक्षात नवीन आहेत, त्यांची हळद अजून उतरायची आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुलसत्तार यांचे कान टोचले आहेत.

संजय राऊत  म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी काही पक्षाची भूमिका मांडलेली नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीबाबत कोण बोलतंय, कुठला मुख्य नेता बोलतोय का? हे आधी तपासून घेतलं पाहिजे. तसेच अब्दुल सत्तार हे अद्याप शिवसेनेमध्ये नवीन आहेत, त्यांची हळद उतरायची आहे. हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात २५ वर्षे पूर्ण केली की त्यांच्य विधानाला काही अर्थ राहील, अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांचे कान टोचले आहेत.

राऊत पुढे म्हणाले की, कुठल्याही नेत्याला पक्ष समजून घेण्यासाठी वेळ लागलो. माझ्यासारख्या व्यक्ती जन्मजात शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे मला काय बोलायचं, यासाठी कुणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज भासत नाही. मात्र जे जन्मता शिवसेनेत आलेले नाहीत, त्यांना पक्ष समजून घेण्यासाठी किमान २० वर्षे घालवावी लागतील. अब्दुल सत्तार हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. पक्षात रुळत आहेत, लोकप्रिय होत आहेत. मात्र विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल, अशी विधान त्यांनी करू नयेत, असा सल्लाही त्यांनी सत्तार यांना दिला.

दरम्यान,  शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा-शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात महत्वाचं विधान केलं होतं. गडकरी राज्यात आले तर शिवसेना-भाजपचे मने जुळतील का? असा प्रश्न मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, नितीन गडकरी ज्यादिवशी मनं जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मनं जुळतील, असे सत्तार यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा