शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

'संजय राऊत वेडा माणूस, परिणाम भोगावे लागणार', संजय शिरसाटांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 16:43 IST

'संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली.'- संजय गायकवाड

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.

लोकमतशी बोलताना संजय शिरसाट म्हणतात की, 'संजय राऊत वेडा माणूस, त्याची जाणीव मला आहे. त्यामुळेच मी वारंवार त्यांच्या विरोधात बोलत असतो. पण, वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल, हे वाटलं नव्हतं. 288 सदस्यांना त्यांनी चोर बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार. ही लहान घटना नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेच्या आधारे हे विधीमंडळ स्थापन झाले आहे. राज्यातल्या 12 कोटी जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांना त्यांनी चोर म्हटले आहे. यात आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे.'

ते पुढे म्हणतात, 'त्यामुळेच सगळ्यांचा रोष त्याच्यावर आहे. सभागृहात एकही सदस्य त्यांच्या बाजूने बोलला नाही. आज तातडीने त्यांच्यावर एआयआर नोंदवला गेला पाहिजे होता आणि अटक झाली पाहिजे होती. आम्ही यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही बोललो. त्यांनाही सांगितलं की, यांची पोलीस सुरक्षा काढून घ्या. पोलीस सुरक्षेत हा बडबड करतो आणि स्वतःला शिवसैनिक म्हणतो. हिम्मत असेल तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावं,' असे आव्हान त्यांनी दिले.

'ज्या 41 सदस्यांच्या जोरावर हा राज्यसभेत गेला, त्यांनाच चोर म्हणतो. नितिम्मता असेल तर यांनी राजीनामा दिला पाहिजे. चोरांच्या मतावर राज्यसभेवर जाणे आणि त्यांनाच चोर म्हणणे योग्य नाही. दरवेळेस शिवसेनेला अडचणीत आणणारा माणूस सुपारीबद्दादर संजय राऊत आहे. संजय राऊतला तुरुंगात टाकणे ही आमची भूमिका असणार आहे,' अशी टीकाही शिरसाट यांनी केली.

संजय गायकवाड यांचीही टीका'संजय राऊतांनी विधीमंडळातील आमदारांना चोर म्हटले, म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे 14-16 आमदारही चोर झाले. ज्या महान लोकांनी राज्याला दिशा दिली, तेदेखील चोर झाले. त्यामुळेच आम्ही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. जोपर्यंत या मार्फत त्यांना शिक्षा होणार नाही, तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही. कारवाई झाली तर सहा महिने त्याला शिक्षा होईल. त्याचा कायमचा बंदोबस्त आम्ही काढतो.'

'संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, मातीत घातली. संघटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली. त्यावेळेस सगळ्या आमदारांना समजून सांगितलं तर परत आले होते. पण, तेव्हा महिला आमदारांना वेष्या म्हणाला, यांची प्रेत वापस येतील अशी वक्तव्ये केली. त्यांनी कधीही उद्धव ठाकरे आणि आमदारांना एकत्र येऊ दिले नाही. तो मूळात शिवसेनाद्रोही आहे. तो बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक नाही,' अशी टीकाही गायकवाड यांनी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे