शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'संजय राऊत वेडा माणूस, परिणाम भोगावे लागणार', संजय शिरसाटांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 16:43 IST

'संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली.'- संजय गायकवाड

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.

लोकमतशी बोलताना संजय शिरसाट म्हणतात की, 'संजय राऊत वेडा माणूस, त्याची जाणीव मला आहे. त्यामुळेच मी वारंवार त्यांच्या विरोधात बोलत असतो. पण, वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल, हे वाटलं नव्हतं. 288 सदस्यांना त्यांनी चोर बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार. ही लहान घटना नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेच्या आधारे हे विधीमंडळ स्थापन झाले आहे. राज्यातल्या 12 कोटी जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांना त्यांनी चोर म्हटले आहे. यात आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे.'

ते पुढे म्हणतात, 'त्यामुळेच सगळ्यांचा रोष त्याच्यावर आहे. सभागृहात एकही सदस्य त्यांच्या बाजूने बोलला नाही. आज तातडीने त्यांच्यावर एआयआर नोंदवला गेला पाहिजे होता आणि अटक झाली पाहिजे होती. आम्ही यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही बोललो. त्यांनाही सांगितलं की, यांची पोलीस सुरक्षा काढून घ्या. पोलीस सुरक्षेत हा बडबड करतो आणि स्वतःला शिवसैनिक म्हणतो. हिम्मत असेल तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावं,' असे आव्हान त्यांनी दिले.

'ज्या 41 सदस्यांच्या जोरावर हा राज्यसभेत गेला, त्यांनाच चोर म्हणतो. नितिम्मता असेल तर यांनी राजीनामा दिला पाहिजे. चोरांच्या मतावर राज्यसभेवर जाणे आणि त्यांनाच चोर म्हणणे योग्य नाही. दरवेळेस शिवसेनेला अडचणीत आणणारा माणूस सुपारीबद्दादर संजय राऊत आहे. संजय राऊतला तुरुंगात टाकणे ही आमची भूमिका असणार आहे,' अशी टीकाही शिरसाट यांनी केली.

संजय गायकवाड यांचीही टीका'संजय राऊतांनी विधीमंडळातील आमदारांना चोर म्हटले, म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे 14-16 आमदारही चोर झाले. ज्या महान लोकांनी राज्याला दिशा दिली, तेदेखील चोर झाले. त्यामुळेच आम्ही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. जोपर्यंत या मार्फत त्यांना शिक्षा होणार नाही, तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही. कारवाई झाली तर सहा महिने त्याला शिक्षा होईल. त्याचा कायमचा बंदोबस्त आम्ही काढतो.'

'संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, मातीत घातली. संघटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली. त्यावेळेस सगळ्या आमदारांना समजून सांगितलं तर परत आले होते. पण, तेव्हा महिला आमदारांना वेष्या म्हणाला, यांची प्रेत वापस येतील अशी वक्तव्ये केली. त्यांनी कधीही उद्धव ठाकरे आणि आमदारांना एकत्र येऊ दिले नाही. तो मूळात शिवसेनाद्रोही आहे. तो बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक नाही,' अशी टीकाही गायकवाड यांनी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे