शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली; औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 08:48 IST

"महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे."

गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा,  असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केले आहे. ते बुलढाणा येथे शिवसेनेच्या मोळाव्यात बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात." 

यावेळी, समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने 'मोदी आला मोदी, अशी हाक आली. यावर, मोदी आला नाही, 'औरंगजेब आला म्हणा', असे राऊतांनी म्हटले आहे. 

"हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे, या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यात औरंगजेब जन्माला आला. पण जे-जे या महाराट्रावर चाल करून आले, ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ते औरंगजेब असेल, शाहिस्ता खान असेल, अफजल खान असेल, त्या सर्वांना याच मातीत गाडण्याचं काम इतिहास झालेले आहे. त्यामुळे आताही त्या विचाराने या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थापन झालेली शिवसेना, त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन चाललो आहोत," असेही संजय राऊत म्हणाले. 

राऊत पुढे म्हणाले, "याद राखा, महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका. हा महाराष्ट्र संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. शिवसेनेवर हल्ला केला, शिवसेनेचे दोन तुकडे केले, ते यासाठी केले, कारण त्यांना या महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी मानसाला संपवायचे आहे. हा महाराष्ट्र विकायचा आहे. मुंबई विकायची आहे आणि उद्योगपतींच्या घषात घालायची आहे. हे आपल्याला होऊ द्यायचे नाही." एवढेच नाही, तर जोवर शिवसेना आहे, तोपर्यंत शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेने पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवससेना तोडली पाहीजे, मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू, अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय. त्यांना तोंड देऊन संघर्ष करून त्यांना मागे हटवायचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना