शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली; औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 08:48 IST

"महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे."

गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा,  असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केले आहे. ते बुलढाणा येथे शिवसेनेच्या मोळाव्यात बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात." 

यावेळी, समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने 'मोदी आला मोदी, अशी हाक आली. यावर, मोदी आला नाही, 'औरंगजेब आला म्हणा', असे राऊतांनी म्हटले आहे. 

"हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे, या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यात औरंगजेब जन्माला आला. पण जे-जे या महाराट्रावर चाल करून आले, ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ते औरंगजेब असेल, शाहिस्ता खान असेल, अफजल खान असेल, त्या सर्वांना याच मातीत गाडण्याचं काम इतिहास झालेले आहे. त्यामुळे आताही त्या विचाराने या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थापन झालेली शिवसेना, त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन चाललो आहोत," असेही संजय राऊत म्हणाले. 

राऊत पुढे म्हणाले, "याद राखा, महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका. हा महाराष्ट्र संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. शिवसेनेवर हल्ला केला, शिवसेनेचे दोन तुकडे केले, ते यासाठी केले, कारण त्यांना या महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी मानसाला संपवायचे आहे. हा महाराष्ट्र विकायचा आहे. मुंबई विकायची आहे आणि उद्योगपतींच्या घषात घालायची आहे. हे आपल्याला होऊ द्यायचे नाही." एवढेच नाही, तर जोवर शिवसेना आहे, तोपर्यंत शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेने पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवससेना तोडली पाहीजे, मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू, अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय. त्यांना तोंड देऊन संघर्ष करून त्यांना मागे हटवायचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना