शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut vs Gulabrao Patil: "उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात"; संजय राऊतांचे बंडखोरांच्या आरोपाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:52 IST

उद्धव ठाकरेंच्या आसपासच्या चार जणांमुळे आताचे बंडखोर आधी अडीच वर्षे सत्तेत होते, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut vs Gulabrao Patil: शिवसेनेमधील एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकलं. एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांच्या गटाने भाजपासोबत सत्तास्थापना केली आणि बहुमत प्रस्तावही जिंकला. यावेळी विशेष अधिवेशनात बोलताना, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या चार जणांच्या कंडोळ्यांवर टीका केली. त्या चार डोक्यामुळेच पक्षाची वाताहत झाली, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. यावर आज शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. ज्या चार जणांवर बंडखोर आमदार टीका करत आहेत त्याच चौघांमुळे हे लोक कालपर्यंत सत्तेत होते, असे राऊत म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांच्या आसपास असलेल्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. हे चार लोक पक्षाचेच काम करत होते. आजही पक्षाचेच काम करत आहेत. तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यांनी खूप काम केले आहे. या चार लोकांमुळेच गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होतात. त्यापूर्वीही आपलं सरकार होतं. पण आज तुम्ही त्या चार लोकांना बदनाम करत आहात. खरे तर ते शिवसेनेचे निष्ठावंत लोक आहेत", अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना प्रत्युत्तर दिले.

उद्धवजी दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेबांचे चिरंजीव!

उद्धव यांच्या जवळ असणाऱ्या चार जणांचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्या लोकांच्या निष्ठेमुळेच पक्षाचे काम अजूनही सुरू आहे. आणि एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. बंडखोरी करून जाणाऱ्या लोकांना काही ना काही कारण सांगायचं असतं. त्यांना बहाणा सापडत नसल्याने ते अशा गोष्टी सांगत सुटले आहेत. पण आता तुम्ही लोक पक्षातून निघून गेले आहात तर बहाणे सांगत बसू नका. आपापली कामं करा", असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव पाटील म्हणाले होते की आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली याचं आम्हाला दु:ख आहे. पण उद्धव ठाकरेंभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवून टाकलंय. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात आणि आमच्याच मतांवर खासदार होतात, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले होते.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना