शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sanjay Raut vs Gulabrao Patil: "उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात"; संजय राऊतांचे बंडखोरांच्या आरोपाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:52 IST

उद्धव ठाकरेंच्या आसपासच्या चार जणांमुळे आताचे बंडखोर आधी अडीच वर्षे सत्तेत होते, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut vs Gulabrao Patil: शिवसेनेमधील एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकलं. एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांच्या गटाने भाजपासोबत सत्तास्थापना केली आणि बहुमत प्रस्तावही जिंकला. यावेळी विशेष अधिवेशनात बोलताना, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या चार जणांच्या कंडोळ्यांवर टीका केली. त्या चार डोक्यामुळेच पक्षाची वाताहत झाली, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. यावर आज शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. ज्या चार जणांवर बंडखोर आमदार टीका करत आहेत त्याच चौघांमुळे हे लोक कालपर्यंत सत्तेत होते, असे राऊत म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांच्या आसपास असलेल्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. हे चार लोक पक्षाचेच काम करत होते. आजही पक्षाचेच काम करत आहेत. तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यांनी खूप काम केले आहे. या चार लोकांमुळेच गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होतात. त्यापूर्वीही आपलं सरकार होतं. पण आज तुम्ही त्या चार लोकांना बदनाम करत आहात. खरे तर ते शिवसेनेचे निष्ठावंत लोक आहेत", अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना प्रत्युत्तर दिले.

उद्धवजी दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेबांचे चिरंजीव!

उद्धव यांच्या जवळ असणाऱ्या चार जणांचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्या लोकांच्या निष्ठेमुळेच पक्षाचे काम अजूनही सुरू आहे. आणि एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. बंडखोरी करून जाणाऱ्या लोकांना काही ना काही कारण सांगायचं असतं. त्यांना बहाणा सापडत नसल्याने ते अशा गोष्टी सांगत सुटले आहेत. पण आता तुम्ही लोक पक्षातून निघून गेले आहात तर बहाणे सांगत बसू नका. आपापली कामं करा", असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव पाटील म्हणाले होते की आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली याचं आम्हाला दु:ख आहे. पण उद्धव ठाकरेंभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवून टाकलंय. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात आणि आमच्याच मतांवर खासदार होतात, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले होते.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना