शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

Sanjay Raut vs Gulabrao Patil: "उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात"; संजय राऊतांचे बंडखोरांच्या आरोपाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:52 IST

उद्धव ठाकरेंच्या आसपासच्या चार जणांमुळे आताचे बंडखोर आधी अडीच वर्षे सत्तेत होते, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut vs Gulabrao Patil: शिवसेनेमधील एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकलं. एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांच्या गटाने भाजपासोबत सत्तास्थापना केली आणि बहुमत प्रस्तावही जिंकला. यावेळी विशेष अधिवेशनात बोलताना, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या चार जणांच्या कंडोळ्यांवर टीका केली. त्या चार डोक्यामुळेच पक्षाची वाताहत झाली, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. यावर आज शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. ज्या चार जणांवर बंडखोर आमदार टीका करत आहेत त्याच चौघांमुळे हे लोक कालपर्यंत सत्तेत होते, असे राऊत म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांच्या आसपास असलेल्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. हे चार लोक पक्षाचेच काम करत होते. आजही पक्षाचेच काम करत आहेत. तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यांनी खूप काम केले आहे. या चार लोकांमुळेच गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होतात. त्यापूर्वीही आपलं सरकार होतं. पण आज तुम्ही त्या चार लोकांना बदनाम करत आहात. खरे तर ते शिवसेनेचे निष्ठावंत लोक आहेत", अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना प्रत्युत्तर दिले.

उद्धवजी दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेबांचे चिरंजीव!

उद्धव यांच्या जवळ असणाऱ्या चार जणांचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्या लोकांच्या निष्ठेमुळेच पक्षाचे काम अजूनही सुरू आहे. आणि एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात. बंडखोरी करून जाणाऱ्या लोकांना काही ना काही कारण सांगायचं असतं. त्यांना बहाणा सापडत नसल्याने ते अशा गोष्टी सांगत सुटले आहेत. पण आता तुम्ही लोक पक्षातून निघून गेले आहात तर बहाणे सांगत बसू नका. आपापली कामं करा", असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव पाटील म्हणाले होते की आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली याचं आम्हाला दु:ख आहे. पण उद्धव ठाकरेंभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवून टाकलंय. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात आणि आमच्याच मतांवर खासदार होतात, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले होते.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना