शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री-२ उपमुख्यमंत्री स्वार झालेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 10:26 IST

गेल्या ८ दिवसांपासून राज्यात शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं.

नवी दिल्ली – महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हल्लाशिवाय राज्यात १०० हून अधिक लोकं मृत्यू पावलेत. हा अत्यंत गंभीर विषय राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या मनाला अस्वस्थ करत नसेल तर त्यांचे मन मेले आहे. दिल्लीवाल्यांच्या मन की बात ऐकायला ते येतात. परंतु नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर याठिकाणच्या लोकांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री स्वार झालेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ आणि चिंतेत आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार फक्त सत्तेवर आहे परंतु कार्यक्षम नाही. त्याचा परिणाम राज्यातील जनता भोगतेय, गेल्या ८ दिवसांपासून राज्यात शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे त्याला जबाबदार राज्यातील बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार आहे. कारण त्यांचे राज्य कारभारात लक्ष नाही. राज्यात काय सुरू आहे? शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे हाल सुरू आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत सरकारला टेंडरबाजी, राजकारण, महामंडळ, पालकमंत्री यात मश्गुल आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रेबाबत कालमर्यादेत प्रकरण मिटवा असं सांगितले. परंतु विधानसभा अध्यक्ष बहुतेक परग्रहावरील घटनेला मानतात, या देशातील घटनेला मानत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या तारखा दिल्यात त्या पुन्हा कोर्टाच्या निदर्शनास आणू. अशाप्रकारे बेकायदेशीर सरकार चालवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबले जातील. सर्वोच्च न्यायालय संवेदनशील परंतु त्यांच्यावर कामाचा ताण आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर पुन्हा उभे राहू. निवडणूक आयोग, पक्ष, चिन्ह वेगवेगळे विषय आहेत ते सर्व मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी

आज राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. आम्ही आमच्या सुनावणीवेळी उपस्थित होतो. शरद पवार कदाचित उभे राहतील. ज्या पक्षाच्या अध्यक्षावर समोरच्या व्यक्तीने खटला दाखल केला, ज्याने पक्ष स्थापन केले, लोकांना पदे दिली, निवडून आणले तेच निवडणूक आयोगासमोर बसणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी आहे असं राऊतांनी म्हटलं.

देशाच्या राजकारणाला लागलेली ही कीड

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात स्पष्ट सांगितले आहे, आमदार-खासदारांची फूट ही पक्षातील फूट नव्हे. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आम्हालाही लागू होईल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था राजकीय दबावाखाली काम करतात. राज्यकर्त्यांना हवे तसे निर्णय दिले जातात, या देशातील राजकारणाला लागलेली ही कीड आहे आणि ती कधीतरी नष्ट करावी लागेल असं विधानही राऊतांनी केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपा