शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; इंडियाऐवजी भारत नाव करण्यावरून सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 11:55 IST

सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? सरकारने फक्त निमंत्रण दिलंय, ही पार्टी आहे का? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

मुंबई - आम्ही इंडिया नाव दिल्याने देशाच्या नावाची भीती वाटते, तुम्ही काय काय बदलणार आहात? भारत हाच इंडिया आहे. संविधान बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्हाला नवी भारत बनवायचा आहे तर रिपब्लिक ऑफ भारत करा. या देशातील जनता हे मंजूर करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, एक देश, एक निवडणूक हा फ्रॉड आहे. राजकीय स्वार्थासाठी असे फ्रॉड करण्यात आलेत. देश लुटण्याचे, खड्ड्यात घालण्याचे अजून एक फ्रॉड आहे. इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून त्यांना इंडिया शब्दाची भीती वाटते. घटनेतील नावाविषयी भय वाटू लागते हा विचित्र प्रकार आहे. भारत, इंडिया हे घटनेतील नाव आहे. इंडियाचे नामोनिशान मिटवण्याचा डरपोकपणा, क्रूर, विकृतपणा आहे. रिपब्लिक ऑफ भारत करा, तुम्ही चंद्रयानात बसून काम करताय का? इंडिया आहे, इंडिया राहील आणि सत्तेवर इंडिया येईल असा दावा त्यांनी केला.

विशेष अधिवेशन कशासाठी?

सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? सरकारने फक्त निमंत्रण दिलंय, ही पार्टी आहे का? तमाशा आहे का? कसलं निमंत्रण आहे? भाजपाचा निरोप समारंभ आहे का? कुठल्याही अजेंड्याशिवाय, कार्यक्रमाशिवाय सरकार विशेष अधिवेशन बोलावते हे काय चाललंय देशात असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यासारखे अनेक प्रश्न आहेत. अधिवेशनाचं निमंत्रण आलंय पण कशासाठी जायचे हेच माहिती नाही असा आरोपही राऊतांनी केला.

त्याचसोबत सोनिया गांधी यांना विरोधकांच्या बैठकीचे अधिकार दिले आहेत. सोनिया गांधी पंतप्रधानांना पत्र लिहणार आहे. देशभरातील खासदारांना एकत्रित का बोलावताय हे कळू द्या, ही कोणती हुकुमशाही आहे. संसदेच्या अधिवेशनाचा विषय सांगितला नाही ही कोणती गोपनीयता आहे. तुम्ही कार्यक्रम कशाला लपवताय? तुम्ही संसदेच्या अधिवेशनाचा अजेंडा सांगितला जात नाही. आम्हाला अधिवेशनात काही प्रश्न मांडायचे आहेत ते मांडू शकतो की नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्दा पेटला आहे. आम्हाला त्यावर आवाज उठवायचा आहे. राज्यात दुष्काळ आहे ते प्रश्न मांडू शकतो की नाही हे सरकारने सांगावे अशी मागणी राऊतांनी केली.

१० वर्षात देश एक इंचही पुढे गेला नाही

मुंबई जी-२० चा कार्यक्रम केला होता, तेव्हा मुंबईतही अनेक ठिकाणी गरिबी दिसू नये म्हणून पडदे लावले होते. तुम्हाला झाकावं लागतंय, कारण लोकं वाकून बघताय, गेल्या १० वर्षात देश एक इंचही पुढे गेला नाही. तीच महागाई, तीच गरिबी, तीच बेरोजगारी, तोच भ्रष्टाचार, तुम्ही किती लपवणार आहे. फक्त इंडियाचे नाव बदलून ही लपवालपवी चालणार नाही असंही राऊतांनी भाजपाला सुनावले. त्याचसोबत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे तोडगा नाही. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी, त्यानंतरच मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटेल. केंद्राने विशेष कायदा करावा आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू असं म्हटलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार