शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; इंडियाऐवजी भारत नाव करण्यावरून सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 11:55 IST

सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? सरकारने फक्त निमंत्रण दिलंय, ही पार्टी आहे का? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

मुंबई - आम्ही इंडिया नाव दिल्याने देशाच्या नावाची भीती वाटते, तुम्ही काय काय बदलणार आहात? भारत हाच इंडिया आहे. संविधान बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्हाला नवी भारत बनवायचा आहे तर रिपब्लिक ऑफ भारत करा. या देशातील जनता हे मंजूर करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, एक देश, एक निवडणूक हा फ्रॉड आहे. राजकीय स्वार्थासाठी असे फ्रॉड करण्यात आलेत. देश लुटण्याचे, खड्ड्यात घालण्याचे अजून एक फ्रॉड आहे. इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून त्यांना इंडिया शब्दाची भीती वाटते. घटनेतील नावाविषयी भय वाटू लागते हा विचित्र प्रकार आहे. भारत, इंडिया हे घटनेतील नाव आहे. इंडियाचे नामोनिशान मिटवण्याचा डरपोकपणा, क्रूर, विकृतपणा आहे. रिपब्लिक ऑफ भारत करा, तुम्ही चंद्रयानात बसून काम करताय का? इंडिया आहे, इंडिया राहील आणि सत्तेवर इंडिया येईल असा दावा त्यांनी केला.

विशेष अधिवेशन कशासाठी?

सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? सरकारने फक्त निमंत्रण दिलंय, ही पार्टी आहे का? तमाशा आहे का? कसलं निमंत्रण आहे? भाजपाचा निरोप समारंभ आहे का? कुठल्याही अजेंड्याशिवाय, कार्यक्रमाशिवाय सरकार विशेष अधिवेशन बोलावते हे काय चाललंय देशात असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यासारखे अनेक प्रश्न आहेत. अधिवेशनाचं निमंत्रण आलंय पण कशासाठी जायचे हेच माहिती नाही असा आरोपही राऊतांनी केला.

त्याचसोबत सोनिया गांधी यांना विरोधकांच्या बैठकीचे अधिकार दिले आहेत. सोनिया गांधी पंतप्रधानांना पत्र लिहणार आहे. देशभरातील खासदारांना एकत्रित का बोलावताय हे कळू द्या, ही कोणती हुकुमशाही आहे. संसदेच्या अधिवेशनाचा विषय सांगितला नाही ही कोणती गोपनीयता आहे. तुम्ही कार्यक्रम कशाला लपवताय? तुम्ही संसदेच्या अधिवेशनाचा अजेंडा सांगितला जात नाही. आम्हाला अधिवेशनात काही प्रश्न मांडायचे आहेत ते मांडू शकतो की नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्दा पेटला आहे. आम्हाला त्यावर आवाज उठवायचा आहे. राज्यात दुष्काळ आहे ते प्रश्न मांडू शकतो की नाही हे सरकारने सांगावे अशी मागणी राऊतांनी केली.

१० वर्षात देश एक इंचही पुढे गेला नाही

मुंबई जी-२० चा कार्यक्रम केला होता, तेव्हा मुंबईतही अनेक ठिकाणी गरिबी दिसू नये म्हणून पडदे लावले होते. तुम्हाला झाकावं लागतंय, कारण लोकं वाकून बघताय, गेल्या १० वर्षात देश एक इंचही पुढे गेला नाही. तीच महागाई, तीच गरिबी, तीच बेरोजगारी, तोच भ्रष्टाचार, तुम्ही किती लपवणार आहे. फक्त इंडियाचे नाव बदलून ही लपवालपवी चालणार नाही असंही राऊतांनी भाजपाला सुनावले. त्याचसोबत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे तोडगा नाही. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी, त्यानंतरच मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटेल. केंद्राने विशेष कायदा करावा आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू असं म्हटलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार