शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:30 IST

Thackeray Group MP Sanjay Raut News: व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला, या शब्दांत संजय राऊत यांनी सरकारच्या प्रगती पुस्तकावर प्रतिक्रिया देताना महायुतीवर निशाणा साधला.

Thackeray Group MP Sanjay Raut News: प्रगतीचा पाढा वाचणे आणि प्रगती पुस्तकावर शेरा असणे यात फरक आहे. पाढे वाचायला काय झाला आहे त्यांना. कुठे आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्राचा एक बाणा होता, कणखर खडखडीत भाणेदार होता, दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला आहे. हिमालय कोण? हिमालय दिल्लीत उरलाय का? महाराष्ट्रात सहयाद्री कोण? एक सीएम आणि दोन डीसीएम हे महाराष्ट्राला आलेले टेंगुळ आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झाले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व ४८ विभागांना १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखून दिला होता. त्यात महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आणखी सुरू केली. त्यामुळे या ४८ विभागांचा रिपोर्ट कार्ड जारी करण्यात आले आहे. त्यात १२ विभागांनी १०० टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे तर फक्त २४ टक्के गुण मिळवून एक विभाग नापास झाला आहे. यावरून संजय राऊतांनीमहायुती सरकारवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला

मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचे प्रगतीपुस्तक जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिकेत १०० दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा. १०६ हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा अधिकार नाही, लायकी शब्द वापरणार नाही. १०६ हुतात्म्यांच्या स्वप्नांना संपवून टाकले. व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, शरद पवार यांनी राज-उद्धव एकत्र आले तर चांगले आहे, असे म्हटले. यावर संजय राऊतांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या तोंडात साखर पडो. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या. राज ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण या भावना आहेत. या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः उद्धव ठाकरे या विषयावर सकारात्मक आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारMahayutiमहायुती