शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

“कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली, महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का”; राऊतांचा CMना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:12 IST

Sanjay Raut News: बदलापूरमधील घटना तुमच्या मतदारसंघात झाली. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होताना दिसत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट सवाल केला आहे.

बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला. तसेच चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने असे कृत्य केले होते. आम्ही फास्टट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे विधान एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले. यावरून पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले. 

तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का?

तुम्ही पाहिले असेल की, मुख्यमंत्र्यांची बदलापूरच्या घटनेनंतर एक क्लिप व्हायरल झाली. मुख्यमंत्री असे सांगत आहेत की, महाराष्ट्रात अशीच घटना घडली. आम्ही ती फास्टट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली. माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे. फाशीची जागा त्यांनी सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली. एखाद्या राज्यात जर कोणाला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते. राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केला. 

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोटारडे आहेत

महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझे आव्हान आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि तुमच्याकडे जर काही अशी नोंद असेल तर तुम्ही ते महाराष्ट्र समोर आणावे. हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजला आहे का? आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे. कारण या राज्याचा मुख्यमंत्री हा संशयीआत्मा आहे. त्यांचा दिवसातला अर्धा दिवस हा संशयकल्लोळात, जादूटोणा, मंत्र, तंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो. त्यांनी संशय घेणे हे सहाजिकच आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, बदलापुरातील आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर उतरली. त्यांच्यावरती कोणीतरी जादूटोणा केला असेल, असे कदाचित त्यांना वाटले असेल. पण, त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की, बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. तुमचा मुलगा तिथे खासदार आहे. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात. तुम्ही म्हणतात ना ठाण्यातील नेतृत्व अनेक वर्षापासून करतो. पण, बदलापूरच्या त्या पीडित महिलेची तक्रार घ्यायला पोलीस दहा तास तयार नव्हते. हे काय विरोधकांनी केले का? त्यात विरोधकांचा काय दोष आहे, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूर