शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

“कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली, महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का”; राऊतांचा CMना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:12 IST

Sanjay Raut News: बदलापूरमधील घटना तुमच्या मतदारसंघात झाली. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होताना दिसत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट सवाल केला आहे.

बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला. तसेच चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने असे कृत्य केले होते. आम्ही फास्टट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असे विधान एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले. यावरून पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले. 

तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का?

तुम्ही पाहिले असेल की, मुख्यमंत्र्यांची बदलापूरच्या घटनेनंतर एक क्लिप व्हायरल झाली. मुख्यमंत्री असे सांगत आहेत की, महाराष्ट्रात अशीच घटना घडली. आम्ही ती फास्टट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली. माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे. फाशीची जागा त्यांनी सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली. एखाद्या राज्यात जर कोणाला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते. राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवले आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केला. 

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोटारडे आहेत

महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझे आव्हान आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि तुमच्याकडे जर काही अशी नोंद असेल तर तुम्ही ते महाराष्ट्र समोर आणावे. हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजला आहे का? आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे. कारण या राज्याचा मुख्यमंत्री हा संशयीआत्मा आहे. त्यांचा दिवसातला अर्धा दिवस हा संशयकल्लोळात, जादूटोणा, मंत्र, तंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो. त्यांनी संशय घेणे हे सहाजिकच आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, बदलापुरातील आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर उतरली. त्यांच्यावरती कोणीतरी जादूटोणा केला असेल, असे कदाचित त्यांना वाटले असेल. पण, त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की, बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. तुमचा मुलगा तिथे खासदार आहे. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात. तुम्ही म्हणतात ना ठाण्यातील नेतृत्व अनेक वर्षापासून करतो. पण, बदलापूरच्या त्या पीडित महिलेची तक्रार घ्यायला पोलीस दहा तास तयार नव्हते. हे काय विरोधकांनी केले का? त्यात विरोधकांचा काय दोष आहे, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूर