शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

...म्हणून अजित पवारांवर कडक शब्दात बोललो, त्याचा खेद वाटतो; संजय राऊतांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 11:17 IST

मी राजेशाहीविरोधात बोललो, आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याविरोधात आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं राऊतांनी सांगितले.

नाशिक - अजित पवारांबाबत मला अर्धवट आणि वेगळा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिले, त्याचा मला खेद वाटतो, मी असे बोलायला नको होते असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. धरणात मुंतण्यापेक्षा थुंकलेले बरे असं सांगत राऊतांनी अजित पवारांवर शनिवारी प्रहार केला होता. त्यावरून आज राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांबद्दल मला अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला. अजित पवार असे बोलले नव्हतो. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव सारखा आहे फार पटकन रिएक्ट होतो. महाराष्ट्रात संयमाने वागले पाहिजे, बोलले पाहिजे असं अजित पवार म्हणाले. पण त्यापुढे संजय राऊतांनी खुलासा केला आहे. त्यांची जीभ दाताखाली आली म्हणून ते थुंकले असं त्यांनी सांगितले. पण पत्रकारांनी अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला. त्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात उत्तर दिले. मला त्याचा खेद वाटतो. मी असे बोलायला नको होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही सगळे सहकारी आहोत. पवार कुटुंबाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. अजित पवार हे मविआचे प्रमुख नेते आहेत. जोपर्यंत संपूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही हे मी ठरवले आहे असं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिले आहे. 

नवी संसद भवन ही फक्त इमारत, इतिहास नाहीहा देश २०१४ नंतर निर्माण झालाय असं काही जणांना वाटते. देशाला स्वातंत्र्य २०१४ नंतर मिळालंय असं पसरवणे, हा हजारो क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान केल्यासारखे आहे. १९२७ साली जे संसद निर्माण झाले. त्या संसदेला इतिहास आहे. त्यात घटनाकार, स्वातंत्र्यात सहभागी झालेले अनेक नेते होते. त्या संसदेत चालताबोलता इतिहास आहे. आम्ही इतिहास वाचणारी माणसे आहोत. या संसदेत महान लोक बसून गेले. आम्ही त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत असं आम्हाला वाटायचे. परंतु नवीन इमारतीत ही भावना निर्माण होईल का अशी माझ्या मनात शंका आहे. ज्यापद्धतीची राजवट, धर्मकांड आपण पाहतोय, लोकांना बोलू दिले जात नाही, लिहू दिले जात नाही. लोकांवर दबाव आहे. कायद्याचा गैरवापर करून सरकारे आणली जातायेत. ही हुकुमशाही आहे. नवीन संसद फक्त इमारत आहे इतिहास नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. 

बेईमान, गद्दारांचे इतिहासात काय झाले वाचावेमी राजेशाहीविरोधात बोललो, आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याविरोधात आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आंदोलन करण्याआधी गद्दार आणि बेईमान या प्रवृत्तीविषयी काय म्हणणे आहे हे सांगावे. त्या काळात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात बेईमान, गद्दारांना गोळ्या घातल्या आहेत. आम्ही सावरकरांचे उदाहरण दिले. हल्ली गद्दारांचे नाव घेतल्यावर माझी जीभ दाताखाली अडकते ते का कळत नाही. जे आंदोलन करतायेत त्यांनी गद्दारी, बेईमानीबाबत काय झाले त्यासाठी इतिहास वाचावा. शिवशाहीत कडेलोट झाला आहे. या गद्दारांना माहिती आहे. लोकांचा संताप आहे त्यामुळे आंदोलने वैगेरे सुरू आहेत अशी टीका राऊतांनी शिवसेनेवर केली. 

आधी निवडणुका घ्या, मग पाहू५०-५० खोके देऊन सरकार पाडले हे वेगाने काम झाले. इतक्या वेगाने काम कधीच झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही सरकार अजून जागेवरच आहे. वेगाबाबत बोलू नका, आधी निवडणुका घ्या मग कामे दाखवा. निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा असं आवाहन संजय राऊतांनी केले. तसेच अजित पवार, नाना पटोले हे राज्याचे प्रमुख आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले, हा प्रश्न कुणी कुणाचे समर्थन करण्याचा नसतो. समर्थकांचा अतिउत्साह असतो. नेते होर्डिंग्स लावायला सांगत नाही. या प्रश्नांना जास्त महत्त्व देऊ नका असं राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊत