शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"विठ्ठलाभोवती बडवे जास्त झालेत म्हणून *** बाहेर..."; Sanjay Raut यांची पुन्हा जीभ घसरली; बंडखोर आमदारांबद्दल आक्षेपार्ह केलं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 14:15 IST

संजय राऊतांनी आक्षेपार्ह शब्द वापरण्याची ही पहिली वेळ नाही

Sanjay Raut slang words bad language: शिवसेनेतील बंडखोर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आणि अतिशय बोचऱ्या शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊत यांनी टीका करताना भाषेतील सभ्यपणा टिकवून ठेवायला हवा, अशी भावना नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर व्यक्त केली. तसेच, राऊत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी असेही काहींनी सुचवले. तरीही, राऊत यांच्या वाणीत किंवा शैलीत फरक झालेला नसून आज पुन्हा एकदा त्यांची बोलताना जीभ घसरली. विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून हे *** पक्षातून बाहेर गेले असं त्यांचं म्हणणं आहे, असं वाक्य संजय राऊतांनी उच्चारलं.

नक्की राऊत काय म्हणाले...

"बंडखोर आमदारांनो, कारणं काय देताय? पहिल्या दिवशी म्हणाले की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी म्हणाले की राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नव्हते. तिसऱ्या दिवशी म्हणाले उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते म्हणून बाहेर पडलो. चौथ्या दिवशी म्हणाले की आदित्य ठाकरे कामात ढवळाढवळ करत होते म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशी म्हणाले की विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून आम्ही सगळे *** बाहेर पडलो", असे संजय राऊत म्हणाले. या वाक्यानंतर जमलेले अनेक लोक मोठमोठ्याने हसू लागले. मात्र, या मध्ये राऊत यांची आजदेखील जीभ घसरली ही बाब जास्त अधोरेखित झाली.

याआधीही जीभ घसरल्याचे अनेक प्रकार-

संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत बोलताना राऊत यांनी दोन ते तीन अतिशय वाईट व आक्षेपार्ह शब्द भर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मीडियासमोर वापरले होते. त्यानंतर, बंडखोरांबद्दल बोलताना डेड बॉडी म्हणजे प्रेतांबद्दलचा उल्लेख केला होता. तसेच, बंडखोरांची तुलना शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांशी करत वेश्याव्यवसायबद्दलही विधान केले होते. त्यानंतर राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी अशी मागणी अनेकांनी केली. पण तरीही राऊत मात्र आजच्या सभेत पुन्हा एकदा आक्षेपार्ह वाक्य बोललेच. त्यामुळे बंडखोर आमदारांची जरी शिवसेनेत परतण्याची इच्छा असली तरी संजय राऊतांच्या अशा विधानाने त्यावर पाणी फेरलं जातंय अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना