शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

"विठ्ठलाभोवती बडवे जास्त झालेत म्हणून *** बाहेर..."; Sanjay Raut यांची पुन्हा जीभ घसरली; बंडखोर आमदारांबद्दल आक्षेपार्ह केलं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 14:15 IST

संजय राऊतांनी आक्षेपार्ह शब्द वापरण्याची ही पहिली वेळ नाही

Sanjay Raut slang words bad language: शिवसेनेतील बंडखोर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत बंड झाल्यापासून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आणि अतिशय बोचऱ्या शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊत यांनी टीका करताना भाषेतील सभ्यपणा टिकवून ठेवायला हवा, अशी भावना नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर व्यक्त केली. तसेच, राऊत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी असेही काहींनी सुचवले. तरीही, राऊत यांच्या वाणीत किंवा शैलीत फरक झालेला नसून आज पुन्हा एकदा त्यांची बोलताना जीभ घसरली. विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून हे *** पक्षातून बाहेर गेले असं त्यांचं म्हणणं आहे, असं वाक्य संजय राऊतांनी उच्चारलं.

नक्की राऊत काय म्हणाले...

"बंडखोर आमदारांनो, कारणं काय देताय? पहिल्या दिवशी म्हणाले की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी म्हणाले की राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नव्हते. तिसऱ्या दिवशी म्हणाले उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते म्हणून बाहेर पडलो. चौथ्या दिवशी म्हणाले की आदित्य ठाकरे कामात ढवळाढवळ करत होते म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशी म्हणाले की विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून आम्ही सगळे *** बाहेर पडलो", असे संजय राऊत म्हणाले. या वाक्यानंतर जमलेले अनेक लोक मोठमोठ्याने हसू लागले. मात्र, या मध्ये राऊत यांची आजदेखील जीभ घसरली ही बाब जास्त अधोरेखित झाली.

याआधीही जीभ घसरल्याचे अनेक प्रकार-

संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत बोलताना राऊत यांनी दोन ते तीन अतिशय वाईट व आक्षेपार्ह शब्द भर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मीडियासमोर वापरले होते. त्यानंतर, बंडखोरांबद्दल बोलताना डेड बॉडी म्हणजे प्रेतांबद्दलचा उल्लेख केला होता. तसेच, बंडखोरांची तुलना शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांशी करत वेश्याव्यवसायबद्दलही विधान केले होते. त्यानंतर राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी अशी मागणी अनेकांनी केली. पण तरीही राऊत मात्र आजच्या सभेत पुन्हा एकदा आक्षेपार्ह वाक्य बोललेच. त्यामुळे बंडखोर आमदारांची जरी शिवसेनेत परतण्याची इच्छा असली तरी संजय राऊतांच्या अशा विधानाने त्यावर पाणी फेरलं जातंय अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना