शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'सांगली' जागेवर तिढा, राऊतांनी पटोलेंना सुनावलं; काँग्रेस-ठाकरे गटात काय बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:29 IST

पटोले हे काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची संयमाने भूमिका घेतली पाहिजे असं राऊतांनी म्हटलं. 

मुंबई - सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही, वेळ आल्यास टोकाची भूमिकाही घेऊ असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले. कदमांसह सांगलीतल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत काँग्रेसचा उमेदवार असेल असं स्पष्ट केले. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंना संयमाने बोललं पाहिजे असा खोचक सल्ला दिला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्हाला सर्व पातळीवर भाजपाचा पराभव करायचा आहे. कोणाला भाजपाला मदत करून काही साध्य करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यातील मविआचे जागावाटप अंतिम झालं आहे. त्या बैठकीत दिल्लीतील ५ प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार, जयंत पाटील आणि मी स्वत: होतो. नेहरू सेंटरमध्ये झालेल्या जागावाटपानंतर कुणी काही भूमिका घेत असेल तर त्यावर बोलणार नाही. पटोले हे काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची संयमाने भूमिका घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आमची तयारी एक पाऊल पुढे जाण्याची तयारी आहे. सांगलीची जागा १०० टक्के ठाकरे गटाला दिली आहे. तिकडे कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल. तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी कुणाचे नाव घेतले नाही. भाजपाला मदत करून कुणाला काही साध्य करायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असंही संजय राऊत यांनी सांगितले.  

काय म्हणाले होते नाना पटोले?

महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला माध्यमांसमोर येतोय तसा काही ठरला नाही. अजूनही जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. सांगलीबाबत चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला दिला ही खोटी बातमी आहे. सांगलीत आमचे उमेदवार विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहे. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे त्यामुळे अद्याप जाहीर केले नाही. ४-५ जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे असं त्यांनी म्हटलं होते. 

टॅग्स :sangli-pcसांगलीSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी