शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सांगलीच्या निर्णयाचा फेरविचार करावा; विश्वजित कदम यांची मविआ नेत्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:58 IST

Sangli Loksabha Election: महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर सांगलीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली, सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांनी राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडे प्रयत्न केले. परंतु ही जागा ठाकरे गटालाच गेल्याने स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

सांगली - Congress Vishwajeet Kadam on Mahavikas Aghadi ( Marathi News ) काँग्रेसलासांगलीची जागा मिळावी अशी सातत्याने १५ दिवसांपासून मागणी केली. त्यात काल महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केले. आजही सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पारख करून पुन्हा या निर्णयाचा फेरविचार करावा ही आमची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती आहे. ही माझी व्यक्तिगत नाही तर काँग्रेस पक्षाची भावना आहे. राज्य आणि देशात जे वातावरण आहे ते नाकारत नाही. परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा असून मविआनं गांभीर्याने या जागेबाबत विचार करावा अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे.

सांगलीत पत्रकार परिषद घेत विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीची जागा ही काँग्रेसकडे असावी, काँग्रेसनं ती लढावी, ही जागा लढण्यास काँग्रेस सक्षम आहे. इथं २ काँग्रेसच्या आमदार आहेत. एक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आहेत. स्थानिक जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी असं आपण नेत्यांना पटवून देत होतो. कोल्हापूरची जागा शाहू छत्रपतींना पंजा चिन्हावर लढायची होती त्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. परंतु उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत जाहीर केली. हा एकतर्फी निर्णय होता, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय व्हायला हवा होता. उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर, परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन जर निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असं त्यांनी म्हटलं. 

तसेच एखादी बातमी पचनी पडायला वेळ लागतो, काल सांगलीची बातमी कानावर पडली तेव्हा आमची ही परिस्थिती निर्माण झाली. आम्ही काँग्रेस पक्षाच्या घटक कार्यकर्त्यांची बोलून जी वस्तूस्थिती समजून घेवून काँग्रेसला ही जागा द्यावी अशी आमची विनंती करतो. येणाऱ्या काळात या जागेबाबत कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन पुढे वाटचाल करू. येणाऱ्या दिवसांत विशाल पाटील वैयक्तिक पातळीवर कार्यकर्त्यांना भेटतील. कार्यकर्त्यांचा ओढा आमच्याकडे आहे. त्यांच्या मनातील भावना समजून घेणे ही नैतिक जबाबदारी आहे. आमच्या भावना आणि जनतेच्या भावना आम्ही पुढे काँग्रेस नेत्यांना सांगू असं विश्वजित कदमांनी म्हटलं. 

दरम्यान, सत्ताधारी पक्षातील भाजपा सरकारने जो चुकीचा कारभार केलाय त्यांना हद्दपार करायचा आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आम्ही भावना मांडतोय. फक्त २४ तास झालेत. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भेटतायेत. त्यांच्या भावना ऐकून जे काही महाविकास आघाडीचं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही पार पाडू असंही विश्वजित कदमांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :sangli-pcसांगलीcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४