शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 10:29 IST

Sangli loksabha Election - सांगली इथं मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते, त्यावेळी निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवरून राऊतांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली. 

सांगली - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ११ दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ३ दिवसांनी आकडेवारी दिली आहे. तिथल्या सर्व मतदारसंघात अचानक ५-६ टक्के मतदानात वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत आलंय. नांदेडला मतदान संपताना ५२ टक्के मतदान होते, तिथे ६२ टक्के मतदान कसे झाले?, निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीचे आकडे जाहीर केले ते धक्कादायक, ११ दिवस मतदान टक्केवारी जाहीर करायला कसे लागतात अशी शंका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.

सांगलीत पत्रकारांशी संजय राऊतांनी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, डिजिटल इंडियात संध्याकाळपर्यंत किती मतदान झाले याचे आकडे आम्हाला समजत होते, पण आश्चर्य असे फक्त नागपूर मतदारसंघात अर्धा टक्के मतदान कमी दाखवलं आहे. नागपूर सोडून सगळीकडे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीय. ही वाढ अचानक कशी झाली, हे वाढलेले मतदान कुणी केले, कुठे गेले, ११ दिवस का लागले. हा प्रश्न देशातील जनतेला प्रश्न पडलेत. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून ते मोदी-शाह यांच्या हातातील बाहुले झालंय का असा सवाल त्यांनी केला.

तसेच पाकिस्तानात निवडणूक लष्कर ठरवतं, कुणाला आघाडी द्यायची, कुणाला पाठिमागे टाकायचे हे पाकिस्तानात लष्कर ठरवतं, तशाच प्रकार भारतात होत आहे. भाजपा मतदाना कमी पडला, त्यातून अचानक मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ११ दिवसांत वाढलेले मतदान आले कुठून? मतपत्रिकेवर मतदान होत होते, तेव्हाही संध्याकाळी ७ पर्यंत आकडेवारी सांगितली जायची. यावेळी डिजिटल इंडिया त्यादिवशी संध्याकाळी आलेली आकडेवारी आणि त्यानंतर ११ दिवसांनी आलेली नवीन आकडेवारी यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं.

स्फोट घडवावा असं देवेंद्र फडणवीसांकडे काही नाही

देवेंद्र फडणवीसांकडे काहीही गोपनीय माहिती नाही, स्फोट करावा असं त्यांच्याकडे काही नाही. फडणवीस लवंगी फटाका इतकाच आवाज करू शकतात. उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाही. मोदी-शाह यांनी तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं नाही. तिथे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद देणार कसं? देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून भरकटलेल्या सारखे बोलतायेत, महाराष्ट्रात लोकसभा, राज्याची विधानसभा हरतायेत. ज्याप्रकारे राजकारण फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू केले, त्या भयातून ते लवंगी फटाकी फोडतायेत असंही संजय राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४