शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

वाळू उपशाने नद्यांची ‘इको सीस्टिम’च धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 03:47 IST

नदीकाठच्या संस्कृतीला वाळू तस्करांचे नख, पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम

नदीकाठावर संस्कृती वसते, असे इतिहास सांगतो, पण राज्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रातून सुरू बेलगाम वाळू उपशामुळे नदी व पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये उघड झाले आहे. नदीचे पात्र रुंद व खोल होणे, काही ठिकाणी नैसर्गिक पात्र व प्रवाहच बदलणे, कृत्रिम पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडून निघणे, जलजन्य वनस्पती, कीटक, जलचर प्राण्यांची अंडी नष्ट होणे अशी कधीही भरून न निघणारी हानी होत असल्याचे राज्यातील पर्यावरण तज्ज्ञांनी नमूद केले. ‘लोकमत’च्या ठिकठिकाणच्या चमूंनी नोंदवलेल्या गंभीर बाबी अशा..... 

विदर्भचंद्रपूर  : वर्धा, वैनगंगा, इरई, उमा, शिरणा नद्यांचे नैसर्गिक पात्रच बदलले आहे. कृत्रिम पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडून निघाली आहे.  वाशीम : पैनगंगा नदीचे पात्र १० ते १५ फूट खाेल गेले आहे. दाेन वर्षांपूर्वी दिग्रस बु गावाजवळील काेल्हापुरी बंधारा फुटून नुकसान झाले हाेते.नागपूर : तस्करांनी कन्हान नदीला लक्ष्य केल्यामुळे पात्रात खड्डे तयार झाले. माती खाेदकामामुळे प्रवाह बदलण्याची शक्यता बळावली आहे. गडचिरोली : जिल्ह्यात ५०० हेक्टर शेतजमिनीच्या हानीचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे, शेतजमीन वाहून गेल्यासंबंधी ७३६.४६ हेक्टर क्षेत्रात नुकसानाची नोंद झाली आहे. गोंदियात नदीपात्र रुंद झाल्याने ३० गावातील शेतकऱ्यांना फटका बसला.मराठवाडानांदेड : वाजेगाव, वांगी, नागापूर, राहेर, मेळगाव परिसरात गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील गोदावरी, सिंदफणा, मांजरा नद्यांमध्ये खड्डे पडले. औरंगाबादच्या फुलंब्रीतील गिरजा नदीतील उपशामुळे दोनदा महापूर आला.उत्तर महाराष्ट्रधुळे जिल्ह्यात तापी, पांझरा, बुराई या प्रमुख नद्यांच्या पात्रातील खड्ड्यांत बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या. जळगावच्या गिरणा नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रात खोल खड्डे पडलेत.पश्चिम महाराष्ट्रपुणे जिल्ह्यात दौंड, पुरंदर, शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा होतो. नद्यांमधील जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. मावळ तालुक्यातील नदीकाठच्या जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण झाल्यामुळे पाणी शेतात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. भूजल पातळीतही घट होत चालली आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा प्रमुख नद्या, तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहे. नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडल्याने ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदललेली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड, पुरंदर, शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा होतो. नद्यांमधील जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. मावळ तालुक्यातील नदीकाठच्या जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण झाल्यामुळे पाणी शेतात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. भूजल पातळीतही घट होत चालली आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा प्रमुख नद्या, तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहे. नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडल्याने ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदललेली आहे.