शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Sambhajinagar: संभाजीनगर, धाराशीव... शहरांच्या नामांतराचा निर्णय उद्याच्या कॅबिनेटमध्ये घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:12 IST

नामांतराच्या निर्णयाला स्थगिती का दिली, याचेही सांगितलं कारण

Sambhajinagar: ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचाही निर्णय घेतला होता. या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. या स्थगितीनंतर, संजय राऊतांसह अनेक नेतेमंडळींनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याचे म्हटले. पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या विषयावर स्पष्टीकरण दिले. ठाकरे सरकारने जेव्हा हे निर्णय घेतले होते त्यावेळी त्यांचे सरकार अल्पमतात होते. त्यामुळे हे निर्णय स्थगित करून उद्याच्या कॅबिनेटमध्ये पुन्हा नव्याने निर्णय घेणार अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली. दोनशे तिनशे निर्णय घेतले. ही कॅबिनेट बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन नामांतरावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर अखेर नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

बंडखोरी करण्याबाबतच्या निर्णयावरही त्यांनी मत व्यक्त केले. शिवसेनेला आणि शिवसैनिकांना वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. ही भूमिका सगळ्यांना न्याय देणारी आहे. पुण्याच्या रस्त्यावर पंढरपूरला जाताना माझं स्वागत करत होते. लोकांच्या भावना बघितल्या, त्यांचा आशीर्वाद घेतला. माझा हे  सगळं करण्यामागे काहीच स्वार्थ नव्हता. एक, दोन नाही तर पन्नास लोक माझ्यामागे आहे. मला मुख्यमंत्री करणार असं सांगत होते. पण मी मुख्यमंत्री पदासाठी आलोच नव्हतो. आपला पक्ष मोठा करण्यासाठी आणि आपल्या माणसांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे म्हणून मी आलो, असेही यावेळी एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे