शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

By संदीप आडनाईक | Updated: December 5, 2024 16:08 IST

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले ...

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले नाही, हे दुर्देवी आहे, ही चूक राज्य सरकारने तत्काळ दुरुस्त करावी अशी मागणी स्वराज पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी केली आहे.राज्य सरकारने शपथविथीच्या जाहिरातीत इतर महापुरुषांची छायाचित्रे प्रसिध्द केली. मात्र, शाहू महाराजांचे छायाचित्र छापले नाही हे चुकीचे आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा स्वराज पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.भाजपने गुरुवारी राज्यातील विविध वृत्तपत्रात शपथविधी सोहळ्यासाठी जी जाहिरात प्रसिध्दीस दिली आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे छायाचित्र आहे, मात्र महाराष्ट्रात आरक्षणाचा दूरदृष्टीचा पहिला निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यात स्थान दिलेलं नाही. याविरोधात सोशल मीडियासह सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी भाजपने सर्वच प्रमुख वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार या भाजपच्या नेत्यांचीही छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत, मात्र, त्यातही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही छायाचित्र वगळलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला परंतु शपथविधी सोहळा पार पडत असताना त्यांचा विसर भाजपला पडल्याने ही जाहिरात टीकेचा विषय ठरत आहे.कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांनी यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, देवेंद्र फडणवीस यांनी आता पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्राला सुपर पॉवर कसे बनवता येईल याकडे लक्ष द्यावे. केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याला प्राधान्य द्यावे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAdvertisingजाहिरातBJPभाजपाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती