शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

By संदीप आडनाईक | Updated: December 5, 2024 16:08 IST

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले ...

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले नाही, हे दुर्देवी आहे, ही चूक राज्य सरकारने तत्काळ दुरुस्त करावी अशी मागणी स्वराज पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी केली आहे.राज्य सरकारने शपथविथीच्या जाहिरातीत इतर महापुरुषांची छायाचित्रे प्रसिध्द केली. मात्र, शाहू महाराजांचे छायाचित्र छापले नाही हे चुकीचे आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा स्वराज पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.भाजपने गुरुवारी राज्यातील विविध वृत्तपत्रात शपथविधी सोहळ्यासाठी जी जाहिरात प्रसिध्दीस दिली आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे छायाचित्र आहे, मात्र महाराष्ट्रात आरक्षणाचा दूरदृष्टीचा पहिला निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यात स्थान दिलेलं नाही. याविरोधात सोशल मीडियासह सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी भाजपने सर्वच प्रमुख वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार या भाजपच्या नेत्यांचीही छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत, मात्र, त्यातही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही छायाचित्र वगळलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला परंतु शपथविधी सोहळा पार पडत असताना त्यांचा विसर भाजपला पडल्याने ही जाहिरात टीकेचा विषय ठरत आहे.कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांनी यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, देवेंद्र फडणवीस यांनी आता पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्राला सुपर पॉवर कसे बनवता येईल याकडे लक्ष द्यावे. केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याला प्राधान्य द्यावे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAdvertisingजाहिरातBJPभाजपाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती