शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:26 IST

Maratha Reservation: यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. आता शिंदे-फडणवीसांनी यात लक्ष घालावे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, यातील काही जणांच्या शपथविधीवरून महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले. 

महाविकास आघाडी सरकारने सरकार स्थापन करण्यासाठी ३० दिवस घेतले होते. आता या नव्या सरकारने ३५ ते ४० दिवस घेतले त्यामुळे एकूण ६० ते ६५ दिवस असेच गेले. असो काही हरकत नाही जे जनतेच्या सेवेसाठीचे वाया गेलेले दिवस आहेत ते भरून काढावेत आणि चांगले जोमाने काम करावे. महाराष्ट्रात अनेक ज्वलंत विषय आहेत प्रश्न आहेत ते सोडवणे गरजेचे होते मात्र असो उशीर झाला तरी त्यांना आमच्या शुभेच्छा, असे संभाजीराजे यांनी सांगितले.  

मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही

यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. मी आमरण उपोषण केल्यानंतर एकनाथ शिंदेदेखील त्यावेळी आले होते तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते मात्र आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले त्या दोघांनी लक्ष घालावे आणि मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यावर जे आरोप आहेत मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेतले असेल तर त्याबाबत मुख्यमंत्रीच त्याचे उत्तर देतील. मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रवक्ते आहेत ते यावर उत्तर देतील, असे सांगत संभाजीराजे यांनी याविषयावर अधिक बोलणे टाळले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस